पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘मेक इन इंडिया’ या नव्या योजनेचा शुभारंभ केला.
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘मेक इन इंडिया’ या नव्या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी भाषण देताना एफडीआयकडे केवळ फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट म्हणून बघितले जाऊ नये तर एफडीआय म्हणजे ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया’ असा अर्थ घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. मेक इन इंडिया ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे मोदींनी सांगितले.
दिल्लीत विज्ञान भवन येथे या योजेनचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी मुकेश अंबानी, अझिम प्रेमजी, कुमार मंगलम बिर्ला, चंदा कोच्चर आणि वाय.सी. देवेश्वर यांच्यासह उद्योगजगातीतल अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती. तसेच मंत्रिमंडळातील विविध मंत्रीही या सोहळ्यास उपस्थित होते.
सरकारवर गुंतवणूक दारांचा विश्वास असला पाहिजे. भारतात गुंतवणूक करण्याबाबत गुंतवणूकदार साशंक असतात. ते सहसा हा धोका पत्करत नाहीत. यासाठी अनेक उद्योजक उद्योगाचा विस्तार करण्यासाठी देशाबाहेर जात आहेत. ही दुख:द बाब असून हे चित्र बदलले पाहिजे. भारतात गुंतवणूक केली जावी अशी विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. एफडीआयही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
एफडीआयचा अर्थ केवळ फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट नसून फर्स्ट डेव्हलप इंडिया असा अर्थ घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. रोजगार निर्माण झाले पाहिजेत. यामुळे गरिबीचा स्तरही उंचावेल. मेक इन इंडिया हे सिंहाचे पाऊल आहे. भारतात उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्यास रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच मोठ्या प्रमाणात खरेदीला चालना मिळेल. यामुळे साहजिकच उत्पादकांना मोठी बाजारपेठ मिळेल, असे मोदींनी सांगितले.
ढापण्या ,Projects पळवतो महाराष्ट्राचे आणि आलाय मोठा शाना ‘मेक इन इंडिया’ वाला