पत्रकार अक्षय सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधान करुन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
भोपाळ – व्यापम घोटाळा प्रकरणाशी संबंधित पाठपुरावा करणा-या पत्रकार अक्षय सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधान करुन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
पत्रकार वत्रकार सोडून द्या. आज आमच्याहून मोठा आहे का पत्रकार? असे वादग्रस्त विधान सोमवारी विजयवर्गिय यांनी पत्रकारांशी बोलताना केले. शनिवारीच पत्रकार अक्षय सिंग यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
दरम्यान, सिंग यांच्या मृत्यूप्रकरणावरुन खिल्ली उडवणा-या विजयवर्गीय यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे. त्यांचे विधान निंदनीय असून याबाबत माफी मागितली पाहिजे असे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी सांगितले.
पत्रकार हे समाजाचे डोले आहेत.म्हणूनच हरामखोर राजकारणी जी पाप करतात त्याची माहिती समाजाला मिळते.मोठा कोण समज कि हराम खोर राजकारणी.