मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेले ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई – मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलात ३ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेले ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी येणा-या काही पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी कलिना संकुलात असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या नावाखाली ८ जानेवारीपर्यंत सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे. विविध विद्यार्थी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
विद्यापीठाकडून दिवाळीत कमी सुट्टया देऊन विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या नावाखाली अधिक सुट्टया देण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या फर्मानविरुद्ध अनेक विद्यार्थी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाला या सायन्स काँग्रेसला येणा-यांची सोयच करायची असेल, तर सरकारी, खासगी यंत्रणेचा वापर करावा, विविध अभ्यासक्रमांची तयारी सुरू असताना विद्यार्थ्यांना सुट्टीवर जाण्याचे आदेश देणे चुकीचे असल्याचे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कलिना संकुलात असलेल्या प्रत्येक वसतिगृहात अगोदरच मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची संख्या आहे. यात अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी सर्व प्रकारचे हाल सोसून दिवस काढतात. मात्र विद्यापीठाने तब्बल ८ जानेवारीपर्यंत ख्रिसमसची सुट्टी जाहीर करून विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर राहण्याचे फर्मान दिले आहेत. त्यामुळे परीक्षांची तयारी करणा-या अनेक विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी त्यांना वसतिगृहातून बाहेर जाण्यास सांगू नये, अशी मागणी सिनेट सदस्य वैराळ यांनी केली आहे.
विद्यापीठात होणा-या इंडियन सायन्स काँग्रेसला देश-विदेशातील सुमारे दीड हजारांहून अधिक मान्यवर आणि १५ हजारांच्या दरम्यान विविध विषयांतील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. अनेक पाहुण्यांच्या निवासव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी वसतिगृहे रिकामी व्हावीत याकरता विद्यार्थ्यांना जादा सुट्टी देण्यात आल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. आपल्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुट्टी देऊन एका मोठया कार्यक्रमापासून दूर ठेवणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठात देश विदेशातून मान्यवर येत आहेत हि फार गर्वाची गोष्ट आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे वसतिगृह रिकामी राहावे याकरिता विद्यर्थ्याना सुट्टी जाहीर करणे चुकीचे आहे. जर का देश विदेशातून मान्यवर येत असतील तर त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या वित्तअधिकारी ने नक्कीच त्यांच्या येण्याकरता, राहण्या खाण्याकरिता उत्तम सोय केली असणारच. म्हणजे त्यांचे आगमन मुंबई विद्यापीठात होताना त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा शुल्क नक्कीच आकारला असणार. जसे तीन वर्षापूर्वी NAAC कडून मुंबई विद्यापीठास भरगोस रक्कम देण्यात आली होती, त्याच प्रमाणे त्यांनी त्या विद्यापीठाची देखभाल आणि विद्यार्थ्यांच्या हितायोग्य प्रगतीकरिता अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसुद्धा घेतली असेलच (उदा. विद्यार्थी कालिना संकुलनात आला कि त्याला नक्कल प्रत करिता सारखी रिक्षा पकडून संकुलनाच्या बाहेर जावे लागते, म्हणून विद्यार्थ्यांकरिता XEROX Machine ची सोय सुद्धा करून ठेवली असेल, नाहीतर काही काही विद्यापीठात एक रुपयाच्या नक्कल प्रत करिता साधारण रु. २०/- ते रु. ३०/- वाया घालवावे लागतात आणि विद्यार्थ्यांना लागणारी गुणपत्रिका ती हि झटपट मिळण्याकरिता PRINTING MACHINE हि उत्कृष्ट दर्जाची घेतली असेलच. PRINTING MACHINE, COMPUTER जास्त वेळ वापरल्याने ते खराब होऊ नये म्हणून त्याकरिता वातानुकुलीत MACHINE (AIR CONDITIONAL).बसवले असतीलच. तसेच LUNCH TIME मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांच्या करिता कर्मचाऱ्याव्यतिरिक्त जागा उपलब्ध करून दिली असेलच. पण जर का देश विदेशातून मान्यवर येत असतील तर त्यांच्या करिता विद्यापीठाने शांत असे विश्रांती गृह उपलब्ध करून द्यावे त्या करिता विद्यार्थ्यांचे वसतिगृह कशा करिता?