जागावाटपाच्या मुद्यावरुन महायुती फुटीच्या उंबरठयावर उभी असताना, आघाडीमध्येही अजून जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही.
मुंबई – जागावाटपाच्या मुद्यावरुन महायुती फुटीच्या उंबरठयावर उभी असताना, आघाडीमध्येही अजून जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. मंगळवारी सकाळी वर्षा निवासस्थानी जागावाटपासंबंधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या निम्म्या जागांच्या मागणीवर कायम आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या मुद्यांची दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींना माहिती देण्यात येणार आहे. आज रात्री वर्षावरच चर्चेची पुन्हा दुसरी फेरी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ जागांची मागणी केली आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते नारायण राणे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. आघाडी झाली पाहिजे मात्र त्यात कुठल्याही अटी नकोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
aghadi zalikay nahi zali kay matdan kon karnar dhangar arkshan sata tar BJP RSP RPI Sena yanar