मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मालवीय आणि त्यांच्या पत्नी सुधा मालवीय यांना जबलपूर-निझामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये लुटण्यात आले.
नवी दिल्ली- मध्यप्रदेशचे अर्थमंत्री जयंत मालवीय आणि त्यांच्या पत्नी सुधा मालवीय यांना जबलपूर-निझामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये लुटण्यात आले. ही घटना मथुरेमधील कोसीकलनजवळ घडली. या प्रकरणी आरपीएफच्या तीन जवानांना निलंबित केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
जयंत मालवीय हे जबलपूर-निझामुद्दीन एक्स्प्रेसने दिल्लीला निघाले होते. दामोह येथे वातानुकूलित डब्यात ते चढले. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दरवाजावर ठोठावण्यात आले. यावेळी त्यांनी दरवाजा उघडल्यावर चौघेजण आत घुसले.
त्यांनी जबरदस्तीने जयंत यांची पर्स, सोन्याची चैन, अंगठी आदी दागिने पळवून नेले. तर माझ्या डाव्या हातातील अंगठी निघत नव्हती. तेव्हा चोरट्यांनी माझे बोट कापण्याचीच धमकी दिली, अशी माहिती अर्थमंत्र्यांच्या पत्नी सुधा मालवीय यांनी दिली. रोख रकमेसह मौल्यवान वस्तू पळविल्यानंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस पोहचले, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्यात पर प्रय्न्तीय का येतात, कारण त्यांना त्यांचा राज्य पोलिसांची गुंड गिरीची भीती वाटते.खासदार फुल्लन देवी ची हत्या होते तिथे सामान्य माणसाने कसे जगावे maharashatrat jave tithechi rahave. महाराष्ट्रातील मराठी हिंदी बोलतात यु पी bhihari मराठी बोलतात कारण मराठी त्यांची रक्षा करते.हिंदी मंत्र्यांना लुटते.हे सत्य समजून घ्या