‘आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. व्यक्तीगत चर्चा केली तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते,’ असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने केले आहे.
जयपूर- ‘आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. व्यक्तीगत चर्चा केली तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते,’ असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने केले आहे.
गुरूवारी जयपूर येथे सुरू झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये करण जोहर याची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भाष्य केले. त्याच्या या वक्तव्यामुळे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलची सुरुवात वादाने झाली.
‘भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन) हा सर्वात मोठा विनोद असून ‘लोकशाही तर त्याहून मोठी थट्टा झाली आहे. तुम्हाला काही खासगी सांगायचे, बोलायचे असेल तर ते या देशात शक्य नाही,’ असे तो म्हणाला.
‘आपण फ्रीडम ऑफ स्पीचच्या गोष्टी करतो, पण जर तुम्ही तुमचे काही मत मांडले तर मोठा वाद निर्माण होतो,’ असेही तो म्हणाला.
मिस्टर कारण जोहर, जीस तरह कि बाववास आप जैसे लोग टेलीविजन पर करते हो, क्या किसी देश मी इस तरह कि बात दुसरे लोग अपने देश के बारे मे बोलते है? लेकीन आप लोग सदा बिकाऊ हो. आप लोगोंको देश कि अस्मिता, देश का गौरव क्या मालूम? आप लोग हमेशा किसी न किसी बहाने चर्चा मे रहना चाहते हो. बस पैसा कमाना हि आप लोगोंका धंदा रहा है. तुम्हे शर्म आनी चाहिये… तुम अगर पाकिस्तान मी होते तो पाकिस्तान मे यह बकवास करते क्या?