चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक भक्तांच्या भावना दुखवणारे वादग्रस्त टि्वट केले आहे.
मुंबई- चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक भक्तांच्या भावना दुखवणारे वादग्रस्त टि्वट केले आहे.
राम गोपाल वर्मा याने ‘गणपती स्वतःच्या हाताने जेवतो की सोंडेने?’ अशा प्रश्न ट्विटरवर विचारला आहे. इतक नव्हे तर त्याने ‘लोक हा सण कशाबद्दल साजरा करतात, गणपतीचा जन्म झाला होता म्हणून की शंकराने त्याचे शीर उडवले होते म्हणून?’ गणपतीला स्वतःच्या शीराचे रक्षण करता आले नव्हते तो दुस-याचे कसे रक्षण करणार असेही रामूने ट्विटरवर म्हटले आहे.
रामूने आपल्या ट्विटरवर केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामूच्या या ट्विटरवर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.
ट्विटरवर रामून काय म्हटले आहे ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अशा कोमेंटस कडे दुर्लक्ष करणेच चांगले.