हाफीझ मोहोम्मद सईदने कोणताही संबंध नसताना पुन्हा एकदा काश्मीरवरुन भारताच्या अंतर्गत विषयामध्ये ढवळाढवळ करुन भारताला डिवचले आहे.
इस्लामाबाद – मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य कारस्थानकर्ता हाफीझ मोहोम्मद सईदने कोणताही संबंध नसताना पुन्हा एकदा काश्मीरवरुन भारताच्या अंतर्गत विषयामध्ये ढवळाढवळ करुन भारताला डिवचले आहे.
काश्मीरी जनतेच्या मदतीसाठी पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले तर, जमात उद दावाचा त्याला पाठिंबा असेल असे हाफीझ सईदने म्हटले आहे.
देशद्रोही मसरत आलमच्या अटकेवरुन काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सईदने भारताला डिवचले.
काश्मीरींच्या अधिकारासाठी आमचे लष्कर जी काय भूमिका स्वीकारेल तो जिहाद असेल असे सईदने म्हटले आहे. भारत जर काश्मीरींना त्यांचे अधिकार देणार नसेल गोळया चालवणार असेल तर त्याचे उत्तर फक्त जिहाद आहे असे सईदने सांगितले.
पाकिस्तानी जनता पाकिस्तान भारतात विलीन करा म्हणून भारतीयांच्या मागे लागली आहे. हे हाफीझ मोहोम्मद सईद ला.माहित नाही काय? भारतीयांनी पाकिस्तानी जनतेला सांगितले.तुमच्या मागणीचा विचार करू पण हाफीझ मोहोम्मद सईद चे काय करायचे.पाकिस्तानी जनतेने सांगितले आम्ही भारतात आल्या नंतर भारतीय न्यायालय त्याचा विरोधात कारवाई करेल. हाफीझ मोहोम्मद सईद.ला सांगा काश्मीर तर मिळणार नाही.पाकिस्तान हातचा घालवून बसशील.भारतीयांची सटकली तर.