कॉँग्रेससह सर्वच विरोधकांनी कडाडून विरोध केल्याने मोदी सरकारचा भू-संपादन अध्यादेश राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता मावळली आहे.
नवी दिल्ली – कॉँग्रेससह सर्वच विरोधकांनी कडाडून विरोध केल्याने मोदी सरकारचा भू-संपादन अध्यादेश राज्यसभेत मंजूर होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे भू-संपादन अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभेत बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने हे विधेयक मंजूर करून घेतले. मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता मावळली.हे विधेयक ५ एप्रिलपूर्वी मंजूर होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा अध्यादेश काढण्याशिवाय सरकारपुढे पर्यायच राहिला नाही.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा भू-संपादन अध्यादेश काढण्याचे ठरवण्यात आले.
I thank you humbly for shnarig your wisdom JJWY