रेल्वे लोकल अथवा परिसरात दादागिरी करणा-या प्रवाशांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलचा दरवाजा आडवत प्रवाशांची अडवणूक करणे, जागा आडवणे, मद्य प्राशन करून दादागिरी करणे, महिलांची छेडछाड काढणे अशा समाजकंटकांवर आता रेल्वे पोलिसांनी करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- रेल्वे लोकल अथवा परिसरात दादागिरी करणा-या प्रवाशांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलचा दरवाजा आडवत प्रवाशांची अडवणूक करणे, जागा आडवणे, मद्यप्राशन करून दादागिरी करणे, महिलांची छेडछाड काढणे अशा समाजकंटकांवर आता रेल्वे पोलिसांनी करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे पोलिसांच्या या निर्णयामुळे रेल्वेतील दादागिरी पडणार भारी, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेने दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याबाबत रेल्वे प्रशासन पाऊल उचलते. मात्र, प्रवाशांना सुविधा किती मिळतात हे न सुटणारे कोडे आहे. योग्य व सुखकर प्रवास हीच प्रवाशांची अपेक्षा असते. परंतु रेल्वे लोकल असो वा रेल्वे परिसर प्रवाशांवर समाजकंटकांच्या अरे रावीला सामोरे जाण्याची वेळ आेढावली आहे.
विशेष करून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी दरवाजा अडवून अन्य प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर अडवणूक होत असल्याचे प्रकार दररोज घडतात. या मुळे लांब पल्ल्यांच्या विशेषता गाडय़ांची कमी संख्या असलेल्या प्रवाशांची कुचंबणा होते. दरवाजे अडवणारे त्यांना गाडीत चढण्यास एकप्रकारे मज्जाव करतात. तर गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना अक्षरश: रेटारेटी करावी लागते. या मुळे दरवाजे अडवणारे आणि गाडीत चढणा-या प्रवाशांमध्ये खटके उडून हातापायीची वेळ येते.
दरवाजे अडवणा-या टोळक्यांबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मात्र आता रेल्वे पोलिसांनी समजाकंटकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, प्रत्येक स्थानकांवर पोलिसांची गस्त वाढवणार आहेत. तसेच जाणा-या-येणा-या लोकलवरही पोलीस नजर ठेवणार असून दरवाजा अडवणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
रेल्वे पोलिसांनी घेतल्या निर्णयामुळे समाजकंटकांना चाप बसल्यास प्रवाशांचा प्रवास ख-या अर्थाने सुखकर होईल, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
समाजकंटकांविरोधात रेल्वे पोलिसांची कारवाई सुरू असते. प्रवाशांनी पुढाकार घेऊन दरवाजा अडवणा-यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यास निश्चित कारवाई करण्यात येते. सध्या जे ग्रुपने प्रवास करतात आणि दरवाजा अडवून दुस-यांना त्रास देतात, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तसेच प्रवाशांनी जागरूकपणे समाजकंटकांविरोधात तक्रार करावी. – रवींद्र सिंघल, रेल्वे पोलीस आयुक्त
चर्चगेट स्थानकाजवळ ज्याप्रमाणे कोणतेही हानिकारक वस्तू असल्यास प्रवेशद्वारातूनच धोक्याची सूचना दिली जाते, त्याचप्रमाणे सर्व स्थानकाजवळ असे प्रवेशद्वार उभारण्यात यावे. लोकलपास हा कोणत्याही व्यक्तीस देण्यात येऊ नये? जसा शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता त्यांचे महाविद्यालयाचे किंवा शाळेचे नाव त्यांच्या पासच्या अर्जावर लिहून नंतरच त्यांना पास देण्यात येतो, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकास त्यांच्या कामाचे ठिकाण आणि कार्यालयाचे नाव जरी “Online” पास देण्याची सुविधा असेल, तरी त्यांच्या पासच्या अर्जात नोंदवून मगच लोकलपास देण्यात यावा, जर एखाद्या लोकल स्थानकाजवळ प्रवेशद्वार उभारण्यात आले, तर नागरिकांच्या लोकलपासला “Mobile Card” ला जसे “Chip” लावण्यात येते ते “Chip” बसवावे, ज्याने प्रवेशद्वारातूनच त्या व्यक्तीची ओळख पटेल. नाहीतरी भारतीय रेल्वेने रहिवाशी दाखला दाखवा आणि लोकल पास मिळवा हा फतवा जवळजवळ नष्टच केला आहे. त्याचप्रमाणे रवींद्र सिंघल, रेल्वे पोलीस आयुक्त यांच्याजवळ सामान्य नागरिकांची एक अशी विनंती आहे कि त्याने रेल्वे बोर्डाकडून प्रत्येक लोकल डब्ब्यात सीसीटीवि कॅमेरासुद्धा बसवावा वाटल्यास प्रत्येक पासात रु.१०/-ची वाढ जरी केली तरी नागरिकांना त्याबद्दल तक्रार नसणार. एक व्यक्ती तब्बल तीन रिकाम्या सीट अडवून बसतो आणि तुम क्या भिडेगा? हमारा बहुत बडा ग्रुप है, अशा धमक्या देत बसतो त्याचे स्पष्टीकरण सिद्ध करण्यास पुरावा म्हणून सीसीटीविचा उपयोग होईल, कारण आपसातील वैमनस्य काढण्यास आजूबाजूच्या व्यक्ती किती जणांना सुपाऱ्या देतील? याची कल्पना हि देता येत नाही. ज्या व्यक्ती सकाळी कामावर जाण्याच्या वेळेस आणि संध्याकाळी कामावरून सुटण्याच्या वेळेस तुडुंब गर्दी करतात, त्या खरोखरीच कामाधंद्याकरिता जाण्यास निघतात कि उगीचच गर्दी उसळवण्यास नाहक गर्दी करतात, हे सुद्धा जेव्हा ते आपले पास मुख्य प्रवेशद्वाराला “Punch” करतील तेव्हा त्याचा आढावा मिळेल. त्याचप्रमाणे जसे महिला डब्ब्यात पुरुष मंडळीना प्रवेश नाकारण्यात येतो, त्याचप्रमाणे पुरुष डब्ब्यात हि महिला मंडळीस प्रवेश नाकारण्यात यावा, उगीचच पुरुष डब्ब्यात बायको, मुलगा, मुलगी घेऊन प्रवास करायचा आणि हमको छेडता है, टकूर टकूर देखता है, अशी कारणे सांगून हाणामाऱ्या करायच्या किंवा मुझपे रेप होने वाला था, अशा खोट्या तक्रारी रेल्वे पोलिस चौकीत नोंदवायच्या, मग महिला मंडळीने पुरुष डब्ब्यात का चढायचे? कारण मुंबई हे ठिकाण आजकाल आतंकवाद पसरवण्यास अग्रेसर ठिकाण म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात नोंदवले गेले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरून जाणाऱ्या खाजगी आणि इतर वाहने जश्या टोलकरिता अडवून नंतर सोडण्यात येतात, तशाच त्या गाड्या अत्यंत महत्वाचे काम असल्यासच रस्त्यावर सोडण्यास मुबा द्यावी, कारण कित्येक “Rikshaw,Taxi” प्रवाशी नसताना हि जिथे “Traffic Jam” होते त्या ठिकाणी आढळतात. त्यात त्यांचा काय भरवसा? कि त्यातूनच ते “बॉम्बस्पोट” सारखे प्रकार घडवून आणतील. एखादी “Rikshaw,Taxi” जवळ जवळ अर्धा,एक तासाच्या “Traffic” मध्ये बिनाप्रवाशी चालवली जाते, म्हणजे तो “Rikshaw,Taxi” वाला किती श्रीमंत असेल याचा विचार करा?