देवगड मध्ये बी. एस. एन. एल. ची सेवा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दुरवस्था होत असून बंद झालेले टेलिफोन पुन्हा सुरु न करण्याचे जणू धोरणच बी. एस. एन. एल. राबवत आहे.
देवगड मध्ये बी. एस. एन. एल. ची सेवा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दुरवस्था होत असून बंद झालेले टेलिफोन पुन्हा सुरु न करण्याचे जणू धोरणच बी. एस. एन. एल. राबवत आहे. एवढेच नव्हे तर जे बी. एस. एन. एल. चे टॉवर बंद आहेत त्या टॉवरही ट्राफिक कमी हे कारण देऊन बी. एस. एन. एल. मोबाईल टॉवरही बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
देवगडचे बी.एस.एन.एल.चे कार्यालयप्रमुख संभाजी सतरकर हे कर्तव्यदक्ष अधिकारी असतानाही केवळ खात्याचा पाठिंबा नसल्याने देवगड मध्ये बी. एस. एन. एल. ची सुविधा सुधारु शकत नाही.
गावागावात जाणा-या केबल तुटल्या अथवा चोरीला गेल्या तर या केबल पुन्हा त्या जोडल्या जात नाहीत. विशेषत: बी. एस. एन. एल. च्या केबल खोदून टाकाव्यात असा नियम असताना त्या पोलवरुन ओढल्या जात आहेत. यामुळे आत असलेल्या तांबे या धातूसाठी या केबल चोरण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत.
मात्र या केबल पुन्हा टाकून टेलिफोन जोडण्यास अडचणी येत आहेत. ब-याचशा ठिकाणाहून गेलेली केबल पुन्हा खोदून त्यात केबल घालण्याची तसदी न घेता ती वरुनच टाकण्यात येते. लॅण्डलाईन ही ब्रॉण्डबॅडची प्राथमिक गरज असल्याने हायस्पीड नेट देण्यास अडचणी होत आहेत. सरकारचे धोरण ऑनलाईन प्रक्रिया करण्यावर असल्याने या मूळ हेतूला बाधा येत आहे.
हीच परिस्थिती मोबाईल सेवेची आहे. मोबाईल रेंजबाबत अनिश्चितता व नेटचा कमी स्पीड या गोष्टी सतत जाणवत आहेत. मोबाईलवर थ्रीजी दिसत असून थ्रीजीचा स्पीड मात्र नशिबात नाही. यामुळे मोबाईल धारकही त्रस्त झाले आहेत.
शहरीभागात ज्यांना ब्रॉण्डबॅडची सुविधा दिली आहे त्यांनाही योग्य प्रकारे स्पीड मिळत नाही. हा स्पीड वाढवण्याची वारंवार खात्री दिली जाते मात्र प्रत्यक्षात यात काहीही फरक पडत नाही. यामुळे केवळ देवगड सारख्या ग्रामीण भागात अन्य कंपन्यांच्या सुविधा नसल्याने बी. एस. एन. एल. करीत असलेला कोंडमारा सहन करणे या पलिकडे कोणताही उपाय शिल्लक राहिलेला नाही. यापेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे बी. एस. एन. एल. बंद ठेवत असलेले मोबाईल ट्रॉवर बी. एस. एन. एल. ने काही ट्रॉवर ट्राफीक कमी आहे या कारणास्तव बंद ठेवले आहेत. देवगड शहरातील पवनचक्कीवरील टॉवर बंदावस्थेत आहे.
हा ट्रॉवर सुरु करण्यासाठी नागरिकांनी वारंवार प्रयत्न केले मात्र मटेरिअल नाही एवढे कारण देत हे ट्रॉवर चालू करण्यास बी. एस. एन. एल. नकार देत आहे. देवगड पवनचक्कीवरील ट्रॉवर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून जर हा ट्रॉवर सुरु नसेल तर समुद्रातून प्रवास करणा-या मच्छीमारी बोटींना मोबाईलची रेंज मिळणे मुश्कील होऊन बसले आहे.
यापेक्षा अनेक तक्रारी नागरिकांच्या असतात मात्र त्यांची साधी सोडवणूकही करण्याची भूमिका बी. एस. एन. एल.ची नाही. लॅण्डलाईन वगळून आम्हाला कसलेही अधिकार नाहीत असे उत्तर स्थानिक कार्यालयातून मिळत असल्याने केवळ हताश होऊन समस्या सहन करणे हे ग्राहकांच्या हातात राहिले आहे. पोर्ट अॅबिलिटीच्या सुविधा वापरुन कित्येक ग्राहकांनी आपले नंबर सोडून दिले आहेत.
मात्र ग्राहकही जे जात आहेत ते जाताना पाहणे या पलिकडे कोणतेच उपाय बी. एस. एन. एल. करताना दिसत नाही. खरे म्हणजे बी. एस. एन. एल. तोटयात जाण्यामागे हेच प्रमुख कारण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात किंजळे पुनर्वसन या गावी देखील एल मोबाईल टावर साधारण ५ ते ६ वर्षापूर्वी बांधून झाला आहे पण अजून तो चालू करण्यात आलेला नाही.सदर टावर कोणत्या मोबाईल कंपनीच्या मालकीचा आहे हे माहित नाही पण हा टावर सुरु झाल्यास ह्याचा आजूबाजूच्या कुळे,देवळे,वाशी,किंजळे,फणसवळे,उमरे,बोरसुत ह्या गावांना खूप फायदा होईल.