मुंबई महानगरपालिका निवडणूक स्व:बळावर लढण्याचा नारा देणा-या सत्ताधारी भाजपाकडून येथील नागरी सोयीसुविधांचे जोरदार भांडवल करणे सुरू आहे.
मुंबई- मुंबई महानगरपालिका निवडणूक स्व:बळावर लढण्याचा नारा देणा-या सत्ताधारी भाजपाकडून येथील नागरी सोयीसुविधांचे जोरदार भांडवल करणे सुरू आहे. अशातच रविवारी रेल्वेच्या एका कार्यक्रमात मुंबई शहरासाठी ४० हजार कोटींचे प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा करीत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांना गोजारण्याचा प्रयत्न केला आहे.
वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या विविध सेवांचे लोकार्पण रविवारी सुरेश प्रभूंच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुरेश प्रभूंनी ही घोषणा केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी लवकरच अनेक योजनांची घोषणा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी भाषण करताना मुंबईसह १०० रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देणार असल्याची जुनीच टेप त्यांनी पुन्हा लावली. तसेच मुंबईकरांना गोजारण्यासाठी ४० हजार कोटींचे प्रकल्प तयार करणार असल्याचे प्रभूंनी या वेळी जाहीर केले. मात्र हे प्रकल्प नेमके काय असणार आहेत याबाबत प्रभूंनी कोणतीही माहिती दिली नाही.
या वेळी दिवा स्थानकावरही जलद लोकलचा थांबा सुरू करण्यात आला. त्याचेही लोकार्पण हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. दरम्यान, सुरेश प्रभू यांची घोषणा म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला नागरी सोयीसुविधांचे भांडवल करून मुंबईकरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सुरू असलेला एक प्रयत्न आहे.
प्रत्यक्षात या घोषणांची परिपूर्तता होणार की नाही याबाबत मतदारांमध्ये प्रश्नचिन्ह असल्याने प्रभूंच्या घोषणा म्हणजे दिवास्वप्न असल्याचे बोलले जाते.
भाजपाचं उद्धिष्ट आहे कि सर्व भारतात हिंदी भाषा राबवायची. ^द हिंदू^ ह्या दक्षिणेतल्या बातमीपत्राने ह्या बद्दल मागच्या वर्षी एक लेख सुद्धा छापला होता एका केंद्र सरकारचा अंतरिम आदेशाचा हवाला देऊन. हाच प्रयोग मागच्या दोन वर्षापासून भाजपा महाराष्ट्रात राबवतेय, उदहारण म्हणजे अधिक रेल्वे गाड्या हिंदी प्रांतातून महाराष्ट्रात सुरुकरणे किंव्हा भाजपाची वाहिनी “झी मीडिया” तर्फे ^काहे दिया परदेस^ सारखी मालिका दाखवून मराठी मुलींनी हिंदी भाषिक मुलांना बरोबर लग्न करावं म्हणजे हिंदी भाषिक संख्या वाढेल आणि हिंदी न बोलणाऱ्यांची(उ. मराठी लोकांची) सांख्य कमी होईल. भाजपा “सोशल इंजिनियरिंग” करतेय!