‘स्वाभिमान’ संघटनेच्या आठव्या वर्धापदिनानिमित्त परळ, येथे सेंट मेरी पटांगणात शनिवारी ‘भव्य महिला रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई –‘स्वाभिमान’ संघटनेच्या आठव्या वर्धापदिनानिमित्त परळ, येथे सेंट मेरी पटांगणात शनिवारी ‘भव्य महिला रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला दादर, माटुंगा, परळ, नायगाव, एलफिन्स्टन, वरळी परिसरातील अनेक महिला व तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसई-विरार परिसरातील महिला व तरुणींनीही रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.
नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने दूरवरून आलेल्या अनेक तरुणींना ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र रोजगार मेळाव्यात होते. काही तरुणी मैत्रिणी आणि नातलगांसोबत आल्या होत्या.
नोकरी मिळाल्यानंतर ग्रुप चर्चाही जागोजाग रंगत होत्या. अनेक तरुणी जॉब लेटर हाती पडल्यानंतर आई-वडील व जवळच्या नातलगांना फोन करण्यात गुंतल्याचे पाहायला मिळत होते. नवरात्रोत्सवाचा जल्लोष सर्वत्र सुरू असताना ‘स्वाभिमान’च्या रोजगार मेळाव्याने हाताला काम दिल्याने रणरागिणीकडून ‘स्वाभिमान’च्या उपक्रमाचे ठिकठिकाणी कौतुक केले जात होते.
नोकरी मिळाल्याचा आनंद आहे!
दीप्ती तारी (कांजूरमार्ग)
लग्न झाल्यानंतर मी नव्या नोकरीच्या शोधात होते. मुंबईत आल्यानंतर मी नोकरीसाठी ‘स्वाभिमान’मार्फत प्रयत्न केला. नोकरीसाठी माझी सर्वप्रथम निवड होईल असे वाटले नव्हते. पहिल्याच प्रयत्नात मला यश लाभल्याने मी फार आनंदी आहे, त्याबद्दल मी नितेशजींची आभारी आहे.
सुरेखा पुजारी (मालाड)
खास महिलांसाठी राबवलेला उपक्रम मी पहिल्यांदाच पाहत आहे. या उपक्रमातून अनेक नवोदितांना चांगली संधी मिळाली आहे. तसेच संघटनेचे सहकार्यही चांगले मिळाले. राज्य सरकारनेही अपंगांच्या नोकरीसाठी अधिक संधी उपलब्ध करावी. या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा.
नेहा गाडगे (वरळी)
माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यातच माझे शिक्षणही अपुरे. त्यामुळे मला नोकरी कशी मिळणार याची चिंता भेडसावत होती. तरीही राणे साहेबांकडे आलेला कोणीही मोकळ्या हाताने परत जात नाही, या विचाराने मी या उपक्रमात सहभाग घेतला. घरातील परिस्थिती बिकट असल्याने मला नोकरीची फार गरज होती. या उपक्रमातून मला नोकरी मिळाल्याने मला फार आनंदित झाली आहे. या नोकरीतून माझ्या घराला नितेशसाहेबांच्या आशीर्वादाने आधार मिळाला आहे, याबद्दल मी संघटनेचे व नितेशजींचे आभार मानते.
जयश्री कामटे (वसई)
माझे शिक्षण अपुरे. त्यातच माझ्या पतींना अंधत्वाचा त्रास आहे. त्यामुळे घरातील सर्व गोष्टींची जबाबदारी माझ्यावरच. यामुळे मला नोकरीची फार गरज होती. यापूर्वी नोकरीचा कुठलाही अनुभव नाही. वाढत्या महागाईमुळे घर खर्च परवडत नाही. त्यामुळे मला चांगल्या नोकरीची गरज होती. ‘स्वाभिमान’च्या उपक्रमातून मिळालेल्या नोकरीमुळे माझ्याबरोबरच कुटुंबीयांनाही आधार मिळाला. त्यामुळे मी खूश आहे. त्याबद्दल मी नितेशजींचे व आयोजकांची आभारी आहे.
महिलांसाठी हा उपक्रम राबविल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. या उपक्रमातून अनेक गृहिणी तसेच तरुणींना नोकरी मिळाली. त्यांना योग्य मार्गदर्शनाबरोबर ‘स्वाभिमान’ने दिलेला मदतीचा हात महत्त्वपूर्ण आहे. मला अपेक्षित नोकरी मिळाल्याने फार आनंद होत आहे. महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता त्यांना सक्षम व मदतीचा हात म्हणून हा चांगला उपक्रम आहे. या उपक्रमातून मदतीच्या आधाराबरोबरच महिलांना समाजात ताठ मानेने चालण्याची ही सुवर्णसंधी दिली आहे.
प्राची करंबे (विरार)
या उपक्रमातून नोकरी मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. गेले कित्येक दिवस मी नोकरीच्या शोधात होते. अनेकदा प्रयत्न करूनही नोकरीची संधी मिळत नव्हती. मात्र ‘स्वभिमान’ संघटनेच्या या उपक्रमामार्फत नोकरीची संधी मिळाल्यामुळे मी नितेशजींची खूप आभारी आहे.
मंगल मोरे (वरळी नाका)
अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नव्हती. मात्र ‘स्वाभिमान’च्या या उपक्रमातून माझ्याबरोबरच कुटुंबीयांनाही आधार मिळाला. त्यामुळे मी संघटनेची व खासकरून नितेशजींची आभारी आहे.
शेख नफिस्सा (विक्रोळी)
पूर्वीच्या नोकरीत अनुभवाप्रमाणे वेतन मिळत नव्हते. मात्र ‘स्वाभिमान’च्या या उपक्रमातून मला नोकरी मिळाल्याने मी आनंदात आहे, याबद्दल मी ‘स्वाभिमान’ संघटनेची व नितेशजींची आभारी आहे.
नमिता खांबल (चर्नी रोड)
माझ्या अनेक अपेक्षा आता नोकरी मिळाल्याने पूर्ण होतील. यामुळे मी खूप आनंदात आहे. पहिल्यादांच मी ‘स्वाभिमान’च्या उपक्रमात सहभागी झाले होते. पहिल्याच मेळाव्यात मला अपेक्षित यश मिळाले. या उपक्रमातून आम्हाला मदतीचा हात दिल्याबद्दल मी ‘स्वाभिमान’ संघटना व नितेश सरांची आभारी आहे.
साक्षी निकम (डोंबिवली)
पूर्वीच्या नोकरीत तुटपुंजा पगार असल्याने मी नवीन नोकरीच्या शोधात होते. या उपक्रमातून मला अपेक्षित नोकरी मिळाल्याने मला फार आनंद झाला. याबद्दल मी संघटनेची व नितेशजींची आभारी आहे.
स्नेहा साळवी (डोंबिवली)
पूर्वी नोकरीच्या ठिकाणी कामाचा भरपूर त्रास होता. त्यामुळे ती नोकरी मी सोडली. नवीन नोकरीच्या शोधात होते. त्यासाठी पाच दिवस फिरत होते. या उपक्रमातून मला नोकरीसोबतच देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. नितेश साहेबांनी या उपक्रमातून महिलांसाठी एक चांगला उपक्रम राबवला आहे. महिलांना मदतीचा हात दिल्याने मी त्यांची आभारी आहे.
प्रतिभा शिंदे (दादर)
‘स्वाभिमान’च्या या उपक्रमातून महिलांना चांगली संधी मिळाली आहे. नितेश साहेबांनी हा उपक्रम वर्षातून किमान एकदा तरी घेऊन स्त्रियांना मदतीचा हात द्यावा. त्यांच्या उपक्रमातून मला नोकरीची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे.
सौभाग्य क्रिष्टक (वरळी)
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होते. पहिल्याच संधीत मला यश आल्याने मला फार आनंद होत आहे. या नव्या उपक्रमाबद्दल मी नितेशसरांचे व संघटनेचे शतश: आभारी आहे.
सायली जगताप (परळ)
मुंबईतील महिलांचा विचार करून भव्य मेळाव्याचे आयोजन केल्याप्रकरणी मी नितेश साहेबांची खूप आभारी आहे. मला या मेळाव्यातून प्रथमच एक उत्तम संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. यापूर्वी अनेक प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नव्हती. या उपक्रमातून अनेक कंपन्यांचा पर्याय आम्हाला मिळाला. साहेबांनी आमच्या घराला नवा आधार दिला.
संजना तरळ (वसई)
मला या उपक्रमातून नोकरी मिळाल्याने मी फार आनंदात आहे. या उपक्रमातून मिळालेला आधार हा आमच्यासाठी अत्यंत अनमोल आहे. त्यामुळे मी नितेशजींची आभारी आहे.
विद्या कांबळे (चेंबूर)
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नव्या नोकरीच्या शोधात होते. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही संधी मिळत नव्हती. वाढती महागाई आणि घरची परिस्थती पूरक नसल्याने मला नोकरीची गरज होती. या उपक्रमातून ती संधी मिळाल्याने मी फार आनंदात आहे.
पूजा पडेलकर (परळ)
मी कॉलेज विद्यार्थिनी आहे. वाढत्या महागाईमुळे शिक्षणाचा खर्च मला परवडत नव्हता. त्यामुळे मी गेले कित्येक दिवस नोकरीच्या शोधात होते. या उपक्रमातून अपेक्षित संधी मिळाल्याने मला फार आनंद होत आहे. याबद्दल मी ‘स्वाभिमान’ संघटना व नितेशसरांची आभारी आहे.
तेजस्विनी कांबळे (वरळी)
मी गेली २० वर्षे सौदी अरेबिया येथे काम करत होती. मात्र आता मला भारतात नोकरीत करायची होती. अनेक प्रयत्न करूनही मला नोकरी मिळत नव्हती. यासाठी मी खूप फिरले. या उपक्रमातून मला नोकरी मिळाल्याने मला व माझ्या कुटुंबीयांना आधार मिळाला आहे. त्याबद्दल मी नितेश सर व ‘स्वाभिमान’ संघटनेची आभारी आहे.
यास्मिन मुलतानी (अंधेरी)
मी कित्येक दिवस नोकरीच्या शोधात होते. ‘स्वाभिमान’मार्फत मिळालेल्या पहिल्याच संधीत मला नोकरी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. या उपक्रमामार्फत मदतीचा हात दिल्याबद्दल मी नितेश सरांची आभारी आहे.
रुबिन्ना शमा (शिवडी)
पूर्वीच्या नोकरीत मी असमाधानी असल्याने नवीन काम शोधत होते. या उपक्रमातून नोकरी मिळाल्याने मी फार आनंदी आहे. हा उपक्रम राबवून स्त्रियांना आधार दिल्याबद्दल मी ‘स्वाभिमान’ संघटना व नितेशजींची आभारी आहे.
शैला मेढेकर (कल्याण)
मी पहिल्यादांच या उपक्रमात सहभागी झाले होते. पहिल्याच प्रयत्नात मला अपेक्षित नोकरी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याबद्दल मी ‘स्वाभिमान’ संघटनेचे व नितेश साहेबांची आभारी आहे.
अर्चना पवार (कुर्ला)
शिक्षण झाल्यानंतर मी नोकरी करत होते. मात्र अपेक्षित नोकरी मिळत नव्हती. या उपक्रमातून पहिल्यांदाच अपेक्षित नोकरी मिळाल्याने मला आनंद होत आहे. स्त्रीशक्तीचा आधार बनल्याबद्दल मी ‘स्वभिमान’ संघटना व सरांची आभारी आहे.
वृंदा खरे (गोरेगाव )
वर्षभरापूर्वी माझी नोकरी सुटली. अनेक प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती. ‘स्वाभिमान’च्या या उपक्रमातून नोकरी मिळाल्याने मी नितेशजींची फार आभारी आहे.
अश्विनी कांबळे (वरळी)
महिलांसाठी हा उपक्रम चांगला आहे. हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवल्यास गरजू महिलांना मदतीचा हात मिळू शकतो. या उपक्रमातून मला तसेच अनेक महिलांना योग्य संधी मिळाल्याबद्दल मी संघटना व नितेशजींची आभारी आहे.
विजयता जाधव (वरळी)
मी यापूर्वी अनेक उपक्रमांत सहभाग घेतला होता. मात्र अपेक्षित संधी मिळत नव्हती. महिलांना रोजगार मिळण्यासाठी राबवण्यात येणारा हा पहिलाच उपक्रम आहे. महिलांना चांगली संधी दिली जात आहे.
ट्रिजा पाटील (शिवडी)
वृत्तपत्रात वाचनात आल्यानंतर सहज रोजगार मेळाव्याला हजेरी लावली. मात्र ताबडतोब नोकरी मिळेल, असे जरादेखील वाटले नव्हते. नोकरी मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे. रोजगार मेळाव्यात दिलेल्या मुलाखतीचाही मला चांगला अनुभव मिळाला आहे.
सायली घाटये (परळ)
मी फ्रेशर असल्याने ताबडतोब चांगली नोकरी मिळत नव्हती. यापूर्वी एका ठिकाणी तीन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीला होते. आता नोकरी मिळाल्याचा अतिव आनंद आहे. नितेश राणे साहेबांचे विशेष आभार.
प्रिया रामाणे (वरळी)
मी स्वत: अंध आहे. माझ्या पत्नीला ‘स्वाभिमान’च्या रोजगार मेळाव्यातून नोकरी मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. चर्चगेट स्टेशन परिसरात असलेल्या टेलिफोन बुथवरील कमाईवर आमचे घर चालते. मात्र, आता पत्नीला नोकरी मिळाल्याने आमच्या संसाराला चांगली मदत होणार आहे. याबद्दल नितेश राणे साहेबांचे खूप आभार.
नारायण कामटे (वसई)
‘स्वभिमान’च्या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग
‘स्वाभिमान संघटने’च्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महिला रोजगार मेळाव्यात एकूण ३४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. रिलायन्स, क्रोमा, रिलायन्स कम्युनिकेशन्स, मॅकडोनल्ड्स, पॅन्टालून्स, शॉपर्स स्टॉप, डिझी कॉल, सीझली कॅफे, कॅफे कॉफी डे, व्होडाफोन, जस्ट डायल, केएफसी, अॅक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक, लँडमार्क इन्शुरन्स, मॅट्रिक्स, आय.एस.एस.सव्र्हिस, आर. बी. दानी कंपनी, एअरटेल, फ्लिपकार्ट, पॅनॉरॉमिक हॉलिडेज, आर. एम. एस. कंपनी, टेली, अॅक्सेस, तनिष्का, फ्रंटलाइन यासारख्या नामवंत कंपन्यांनी या रोजगार मेळाव्यात महिलांसाठी आपल्याकडील नोक-या उपलब्ध करून दिल्या. यावेळी कंपन्यांकडून निवड केल्यानंतर त्याच ठिकाणी नियुक्तीचे पत्र महिला उमेदवारांना देण्यात आले.
stutya upkram ahe. rozgarnirmitila chalna milel.