रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या दुस-या रेल्वे अर्थसंकल्पातून लोकांची फसवणूक केल्याची प्रतिक्रीया राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे.
पटणा- रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या दुस-या रेल्वे अर्थसंकल्पातून लोकांची फसवणूक केल्याची प्रतिक्रीया राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलतांना लालू प्रसाद यांनी रेल्वे अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले.
रेल्वे रुळ ओलांडतांना अनेक प्रवाशांचा मृत्यू होते. असे असतांनाही सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही नवीन घोषणा करण्यात आलेल्या नाहीत, असे ते म्हणाले.
‘या रेल्वे अर्थसंकल्पात काहीही देण्यात आलेले नाही. आता येत्या सोमवारी सादर होणा-या अर्थसंकल्पातही काही नवीन घोषणा होतील, अशी अपेक्षा बाळगणे फोल ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.
[EPSB]
रेल्वे प्रवास ‘जैसे थे’ »
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या दुस-या रेल्वे अर्थसंकल्पातही कोणत्याही नव्या घोषणा न करता पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याचे म्हटले आहे. [/EPSB]
हे लालू फारच चालू आहेत