भारत-पाकिस्तान सामन्यात विराटने चांगली खेळी केल्यामुळे खुश होऊन अनुष्काने फोन करून त्याचे अभिनंदन केले.
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघामधील फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे तुटलेले बंध आता पुन्हा एकदा जुळणार असल्याचे दिसते आहे. नुकताच झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये विराटने चांगली खेळी केली. त्याचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले. त्याची ही फटकेबाजी पाहून अनुष्का खूश झाली आणि तिने विराटला फोन केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
अनुष्काने विराटला फोन करून त्याचे अभिनंदन केले. पूर्वी अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावत होती.
विराट लग्नासाठी तयार होता. त्याने अनुष्काला विचारले असता तिने करिअरमुळे त्याला लग्नाला नकार दिला. तर त्यांनी सोशल साईट्सवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले. त्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाले की काय अशी चर्चा होत होत्या. पण अनुष्काच्या एका फोनमुळे पुन्हा एकदा या दोघांची तार जुळण्याची चिन्हे दिसत आहेत.
ह्यांचे केव्हाच जुळणार नाही, जुळले तर ते टिकणार नाही …… मोठ्या नावाची मोठी लक्षणे अशीच असतात, सिनेमावली एका बरोबर केव्हाच राहू सकट नाही ……… विराटचा फॉम आता येतोय त्याला अनिश्काची नजर लागायला नको …….. जवळ wordcup आलेला आहे……