मुंबईकरांना आपल्या तक्रारी एकाच क्रमांकावर डायल करताच मांडता याव्यात यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या १९१६ या टोल फ्री क्रमांकाच्या दूरध्वनीवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.
मुंबई – मुंबईकरांना आपल्या तक्रारी एकाच क्रमांकावर डायल करताच मांडता याव्यात यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या १९१६ या टोल फ्री क्रमांकाच्या दूरध्वनीवर तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र या तक्रारींचा निपटारा होण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालिन आयुक्त सुबोध कुमार यांच्या कारकिर्दीत निवाडा होत असलेल्या तक्रारींच्या तुलनेत आता तक्रारीच निकाली निघत नसल्यामुळे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांचा धाकच अधिका-यांवर राहिला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेने २०००मध्ये जनतेच्या तक्रारींसाठी १९१६ ही हेल्पलाइन सुरू केली. या हेल्पलाइनवर महापालिकेच्या खात्यांसंदर्भात जनतेच्या तक्रारी मांडता याव्यात म्हणून सुरू केलेल्या या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाइनवर अनधिकृत बांधकाम, तुटलेले मॅनहोल्स, झाडांना पाणी नाही, साचलेला कचरा, कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा, दुषित पाणी, नाल्यातील गाळ काढून ठेवला, झाडांच्या तुटलेल्या फांद्या अशा प्रकारच्या तब्बल ६० प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण विभागात यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु २०१०पासून २०१२पर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण तब्बल ९८ ते ९९ टक्के होते. या कालावधीत सुबोध कुमार हे महापालिकेचे आयुक्त होते. परंतु २०१२पासून सध्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या काळात या ऑनलाइन तक्रारींच्या निवारणाचे प्रमाण कमी होत ८५ टक्क्यांवर आले आहे, तसेच मे २०१३पर्यंत महापालिकेच्या अधिका-यांकडून ७६ टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
कुंटेंच्या काळात सुरू झाली हेल्पलाइन
हेल्पलाइन सुरू केल्यानंतर पूर्वी दरदिवशी ३५० ते ४०० तक्रारी प्राप्त व्हायच्या. या तक्रारी आठ दिवसांमध्ये निकालात काढल्या जायचा. त्यामुळे आपत्कालिन विभागाच्या प्रमुखाने या तक्रारींचे निवारण झाल्यानंतर पडताळणी करावी, असा नियम आहे. तत्कालिन अतिरिक्त आयुक्त सीताराम कुंटे यांनीच हा नियम केला होता. या प्रत्यक्ष भेटीमुळे किमान दोन टक्के तरी तक्रारी पूर्णपणे निकालात निघतील, असा त्यांचा उद्देश होता. परंतु आता प्रत्यक्ष भेट देत ही तपासणीही केली जात नसल्याचे एका निवृत्त अधिका-याचे म्हणणे आहे.
कशी करतात तक्रार?
१९१६ या क्रमांकावर फोन केल्यावर तक्रारदारराच्या म्हणण्याप्रमाणे ऑनलाइन तक्रारींचा ड्राफ्ट संगणकावर भरून संबंधित खात्याच्या अधिका-यांकडे पाठवला जातो. त्यामुळे तक्रार निकालात काढल्यानंतर संबंधित विभाग या कक्षाशी संपर्क साधून माहिती देतो. तोपर्यंत या कक्षाचा या विभागाशी काही संपर्क नसतो. ज्यावेळी तक्रारदार पुन्हा तक्रार करतात, तेव्हा कक्षातील कर्मचारी पुन्हा त्याचा पाठपुरावा करतात. याव्यतिरिक्त या कक्षाची भूमिका काहीच नसते, असे आपत्कालिन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले. तक्रारी संबंधित विभागाला पाठवल्यानंतर त्या सोडवणे हे त्या विभागाला बंधनकारक असते. जनतेच्या तक्रारी निकालात निघाल्यामुळे अनेक जण दूरध्वनीद्वारे समाधान व्यक्त करत अनेकांकडून कृतज्ञता करतात, असे ते म्हणाले.
वर्ष | एकूण तक्रारी | निपटारा | शिल्लक | |
२०१० | ३,०२,१०३ | २,९९,५३४ | २,५६९ | |
२०११ | ३,३५,३८७ | ३,२९,७८४ | ५,६०३ | |
२०१२ | १,७७,६६८ | १,५१,८१६ | २५,८५२ | |
मे२०१३ | ६२,१७१ | ४७,१३५ | १५,०३६ |
1916 ya numbar var takrari kelya tari khahich karvai hot nahi. mahapalica lokana ulu banvte. jagat bhrastacharamhadhe mumbai mahapalikecha pahila numbar lagel.etake bhrast lok hahet mahapaliket…