आमदार नितेश राणे यांचा फेरीवाल्यांना इशारा
मुंबई – अनधिकृत फेरीवाले जर मराठी माणसाला मारहाण करणार असतील तर ते कदापिही सहन करणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. मुंबई काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष, अशी ठेवायची आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी होत असून त्यामुळे चेंगराचेंगरीच्या घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. शनिवारी, मालाड पश्चिमेच्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी गेलेले मनसेचे विभाग प्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात माळवदे जखमी झाले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रविवारी माळवदे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच मराठी माणूस कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर अन्धिकृत फेरीवाले हल्ला करणार असतील, तर ते कदापिही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
अनधिकृत फेरीवाल्यांची पाठराखण करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचाही नितेश राणे यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये समाचार घेतला. मुंबई काँग्रेसला आपली ओळख फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशीच ठेवायची आहे का? काँग्रेसला मराठी माणसांच्या मतांचीही गरज आहे. पण तुर्तास तसे दिसत नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या राजकीय व्यक्तीने त्यांना उघडपणे समर्थन दिले आहे.
नितेश राणे साहेब तुम्ही खरंच मोठ्या मनाचे आहेत तुमचे मनापासून आभार, कारण कि इतर लोक त्या ठिकाणी शेवटी घालून गप्प बसले पण तुम्ही मात्र वाघासारखे धावून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आम्ही जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असलो तरी शेवटी मराठी माणूस म्हणून आपण सगळेच एकमेकांच्या मदतीला धावले पाहिजे हे आपले कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.