नवी मुंबईमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त पाम बीच रोडवर मानवी साखळी तयार करुन साडे पाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकावण्यात आला.
नवी मुंबई- देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवी मुंबईमध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त पाम बीच रोडवर मानवी साखळी तयार करुन सर्वात मोठा साडे पाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकावण्यात आला.
यापूर्वी देशात ५१०० मीटर लांबीच्या तिरंग्याच्या मानवी साखळीचा विक्रम आहे. मात्र यंदाच्या स्वातंत्र्यदिनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ५५०० मीटरचा तिरंगा फडकावत हा रेकॉर्ड तोडण्यात आला आहे.
यावेळी पारंपरिक वेशभूषा हे या मानवी साखळी तिरंग्याचे आकर्षण होते. तर शाळकरी मुले पाणी बचाव, बेटी बचावचे फलक झळकवत होते. सर्वधर्म समभाव आणि एकता आजही या देशात कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मानवी साखळी तिरंग्याद्वारा नवी मुंबईकरांनी केला.
भारतीय नागरीकांमध्ये राष्ट्रहिताची जागृती निर्माण होइल.