नरेंद्र मोदी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपवर पलटवार केला आहे.
नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपवर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नग्न सांप्रदायिकतेपेक्षा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा केव्हाही चांगला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सांप्रदायिकतेमुळे विभाजन होते तर धर्मनिरपेक्षता माणसांना जोडते असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसने सोमवारी खास पत्रकारपरिषद घेऊन नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला. नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचा दावा करतात पण त्यांच्या कार्यकाळातच गुजरात विकासाच्या अनेक आघाडयांवर पिछाडीवर पडला आहे दावा माकन यांनी केला.
काँग्रेसने मोदींना विचारलेले प्रश्न
मोदी १० वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी काय केले?
गुजरातमधील एकही खेळाडू ऑलिंपिक पदक का जिंकू शकला नाही?
राष्ट्रीय खेळांमध्ये गुजरातला कमी सुवर्णपदके का?
शिक्षण क्षेत्रात गुजरात १४ व्या स्थानावर का?
शिक्षणावर केवळ १३.९ टक्के खर्च का?
पदवी व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदे रिक्त का?
विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण गुजरातमध्ये ५७ टक्के का?
पर्यटन क्षेत्रात गुजरात १० व्या स्थानावर का?
स्त्री-पुरुष साक्षरतेमध्ये गुजरातमध्ये मोठी तफावत का?
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख जर चुकीची माहिती देत असतील, चूकीची आकडेवारी सांगत असतली तर आम्हाला त्याला उत्तर दिले पाहिजे असे माकन म्हणाले. नरेंद्र मोदी यांची रविवारी पुण्यात जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांनी अर्थव्यवस्था, विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. जेव्हा संकटाची स्थिती ओढावते तेव्हा प्रत्येकवेळी काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पाघंरुन बंकरमध्ये लपून बसते असा आरोप मोदी यांनी केला होता.
नरेंद्र मोदी चुकीची माहिती, आकडेवारी सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत असे माकन म्हणाले. जो माणूस स्वत:च्या राज्यात अपयशी ठरला आहे त्याला देशाने काय करावे हे सांगण्याचा अधिकार नाही असे माकन म्हणाले. रालोआपेक्षा संपुआची अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी आहे असा दावा माकन यांनी केला. लोकांना सर्वसमावेशक भारत हवा आहे की, जाती-पातींमध्ये विभागलेला ते लोकांना ठरवायचे आहे असे माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी म्हणाले.
[EPSB]
मोदींनी महाराष्ट्राला शिकवू नये »
आम्हाला शिक्षणाचे धडे देणा-यांनी त्यांचे साक्षरतेचे प्रमाण किमान महाराष्ट्राच्या बरोबरीत तरी आणावे, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
[/EPSB]
चोराच्या उलट्या बोंबा असा हा प्रकार आहे. मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे आणि भलतेच बरालायचे असे आहे.
भ्रष्टाचार, घोटाळे, महागाई याबाबत हे काहीच बोलत नाही. लोकपाल बाबत लोकांचा विशास्घात केला..