ख-या अर्थाने आजचे युग हे तरुणांचे आहे. अनेक तरुण आज संसदेत जात आहेत. अशा वेळी गेल्या पाच वर्षाच्या अनुभवाची शिदोरी असलेले काँग्रेस आघाडीचे उमेदवार हे इतर सर्व उमेदवारांपेक्षा सर्व बाबतीत उजवे उमेदवार आहेत.
रत्नागिरी – ख-या अर्थाने आजचे युग हे तरुणांचे आहे. अनेक तरुण आज संसदेत जात आहेत. अशा वेळी गेल्या पाच वर्षाच्या अनुभवाची शिदोरी असलेले काँग्रेस आघाडीचे उमेदवार हे इतर सर्व उमेदवारांपेक्षा सर्व बाबतीत उजवे उमेदवार आहेत. या भागातील प्रश्न हिंदी आणि इंग्रजीतून उत्तमपणे मांडणारे आहेत. त्यामुळे डॉ. राणे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतून डॉ. राणे यांना ५० हजाराचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वानी मनापासून, कष्टाने काम केले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे मांडली.
राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कुणबी सेना आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतील हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर उद्योगमंत्री नारायण राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष एम. एम. शेख, बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम, तालुकाध्यक्ष नाना मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून डॉ. निलेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात अत्यंत हळुवारपणे तर कधी आक्रमक शैलीत काम करताना आपल्या कार्याचा ठसा मतदारसंघात उमटवला. आपल्या कार्यातून, कामातून या मतदारसंघातील १३ तालुक्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख डॉ. राणे यांनी निर्माण केली.
त्यांनी मतदारसंघात केलेले काम, त्यांचा जनसंपर्क हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. गेल्या पाच वर्षातील अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. आपल्यातील एक तरुण सहकारी पुढे जात आहे. त्याला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचे काम आपण सर्वानी करण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.
शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना पवार म्हणाले की, आज शिवसेनेने कोणाला ताकद दिली? बाळासाहेबानंतर पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर या पक्षाची काय स्थिती आहे? कोणत्या प्रश्नांची जाण आहे? सुरुवातीला दुष्काळामुळे आणि त्यानंतर पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटच्या तडाख्यामुळे शेतकरी अडचणीत आला.
संकटात सापडलेल्या शेतक-याला केंद्र सरकार तसेच राज्य सरकार पाठीशी राहीले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दौरा करून शेतक-यांना दिलासा दिला. अशा वेळी शिवसेनेचा एक तरी नेता त्या ठिकाणी गेला का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
शिवसेनेला आपल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न माहीत नाहीत. ते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय सोडवणार, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
शिवसेनेला आज उतरती कळा लागली आहे. अनेक जण पक्ष सोडून जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रश्न शिवसेनेला मार्गी लावता आला नाही. ती शिवसेना लोकांसाठी काय करणार?. देशपातळीवर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर ही नेते मंडळी सर्वाना पुढे नेण्याचे काम करत आहेत.
शिवसेनेत कोणता नेता असा आहे की तो संसदेत राज्याचा प्रश्न पोडतिडकीने मांडू शकतो. देशाच्या, राज्याच्या हिताच्या दृष्टीने असे लोक चालणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले
Ajit pawar (DaDa) narayan rane (dada) Dhoni dada ektra yeun Maharashtra chya Hitache Ani kokanthalya sarv samjala ektra ghun kokanchya vikasala hathbhar lavayche vachan dile hai .Virodhkan kadun fakht NARAYAN RANE virodh KARYCHA ekakalmi Karykram karycha.virodha Karnare don don tin tin vela aamdar jale hahet .Mag maja tumala sarv virodhkana eak prashana hai DEOGAD mATDAR SANGAHAT 4 VELA AMADAR UTICHA HAI TARI BAKI SARVA SODA JE LOKCHE MULABHUT Prashna hait te sodavu shakle nahi.Aani vicharthat vikas kay kela rane shebani.Rane vikashchya mudyavar NIVADNUK lADAVTHAYAT.HAI VIRODHK nARAYAN rANE VIRODHA kARUN.