दादर शिवाजी पार्क परिसर व बालमोहन शाळा परिसर ‘शांतता क्षेत्र’मध्ये येत असून, या भागात ध्वनिप्रदूषण करणा-यांवरकारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र या फलकाकडे दुर्लक्ष करत दिवाळीचे निमित्त साधून शुक्रवारी रात्री एक वाजता फटाके फोडण्याचा पराक्रम येथील काही अतिउत्साही तरुणांनी केला.
मुंबई- दादर शिवाजी पार्क परिसर व बालमोहन शाळा परिसर ‘शांतता क्षेत्र’मध्ये येत असून, या भागात ध्वनिप्रदूषण करणा-यांवरकारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा फलक लावण्यात आला आहे. मात्र या फलकाकडे दुर्लक्ष करत दिवाळीचे निमित्त साधून शुक्रवारी रात्री एक वाजता फटाके फोडण्याचा पराक्रम येथील काही अतिउत्साही तरुणांनी केला. त्यामुळे शिवाजी पार्कवासीयांच्या कानठळ्या बसल्या असून, स्थानिकांनी याबाबत शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचे रहिवासी माधव गोठोस्कर यांनी सांगितले.
[poll id=”818″]
दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु पोलिस येण्याआधीच फटाके फोडण्याचा प्रकार थांबला, असेही गोठस्कर यांनी सांगितले.
रात्री १०वाजल्यानंतर फटाके फोडू नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तरीही दिवाळीत फटाके फोडले जातात. शांतता क्षेत्रात फटाके फोडू नयेत, असा नियम असतानाही या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जाते. दादरच्या शिवाजी पार्क परिसरापुरताच हा प्रश्न नसून, मरिन ड्राइव्ह येथील नागरिकांनीही रात्री फटाके फोडले जात असल्याबाबत तक्रार केली आहे. दिवाळीचा सण म्हटल्यावर फटाके फोडणे हे स्वाभाविकच आहे.
परंतु रुग्णालय, शाळा या परिसरात फटाके फोडण्यावर बंदी असतानाही त्याच फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक असते. रात्री अथवा पहाटे तीन-चार वाजता फटाके फोडले जातात. पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिस दखलही घेतात. परंतु पोलिस कुठे कुठे पाहणार? दुस-याला त्रास होऊ नये, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यामुळे पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही, असेही गोठोस्कर ते म्हणाले.
रस्त्यावर कचरा केल्यास आपल्यालाच त्रास होतो, हे माहिती असतानाही रस्त्यावर सर्रासपणे फटाके फोडून जळालेल्या फटाक्यांचा कचरा तसाच पडून राहतो. विशेष म्हणजे उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशीच फटाके फोडत नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. अशा रहिवाशांवर कारवाई झाली पाहिजे. कमी आवाजाचे फटाके फोडण्याबाबत आणि नियमांची माहिती नागरिकांना व्हावी याकरता व्यापक प्रमाणात जनजागृती केली पाहिजे, असे गोठोस्कर यांनी सांगितले.
जाउ द्या ओ ! दिवाळी कोणी वर्ष भर साजरी करत बसत नाहीत , थोडासा त्रास सहन करायला शिका ,!