वाहतुकीच्या नियमांची वारंवार पायमल्ली कऱणा-या चालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ई-चलन ही पद्धती राज्यभरात सक्तीचे करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
मुंबई – देशात सुरक्षित वाहतुकीचे नियम मोडणा-यांची संख्या काही कमी नाही. वाहतुकीच्या नियमांची वारंवार पायमल्ली कऱणा-या चालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ई-चलन ही पद्धती राज्यभरात सक्तीचे करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
ई-चलनात्मक पद्धती ठाणे आणि नवी मुंबईत सुरु केल्यानंतर येत्या जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात यापद्धतीची अंमलबजावणी करणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
ई-चलनासाठी वाहतूक पोलिसांना विशिष्ट प्रकारचे मशीन दिले जाईल. तसेच यासोबत हँडी प्रिंटरही दिला जाईल. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणा-यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाईल. यात वाहनाचे छायाचित्र, चालकाचा परवाना नंबर, त्याला किती दंड भरायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती असेल. त्यामुळे एखाद्या वाहनचालकाने यापूर्वी कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले याची माहितीही मिळेल. तसेच वारंवार नियम मोडणा-यांवर कडक कारवाई होईल.
अरे रस्ते प्रथम दुरुस्त करा ,आणि मग इ- चलन ,paddhaticha विचार करा,