मागील आठ वर्षे सातत्याने स्वत:च्या जागेसाठी झगडणा-या वाणगाव येथील आदिवासी महिलेने अखेर हा लढा जिंकला आहे.
डहाणू – मागील आठ वर्षे सातत्याने स्वत:च्या जागेसाठी झगडणा-या वाणगाव येथील आदिवासी महिलेने अखेर हा लढा जिंकला आहे. आदिवासी एकता परिषदेने केलेले प्रयत्न आणि अप्पर जिल्हाधिकारी जव्हार यांनी दिलेल्या आदेशानंतर डहाणू तहसीलदारांनी २ जेसीबी, २ दंगलविरोधी पथके, १००च्या आसपास पोलिस बळ आणि डहाणू महसूल विभागातील कर्मचा-यांच्या बंदोबस्तात सोमवारी आदिवासी प्रत्यार्पण कायद्यानुसार या जागेवरील अतिक्रमणे हटवून हा भूखंड या आदिवासी महिलेच्या स्वाधीन केला.
वाणगाव पाटीलपाडा येथील सव्र्हे नंबर ९२/७ या भूखंडावर बिगर आदिवासींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे ही जागा मोकळी करून मिळण्यासाठी भूखंड मालक रेखा काठय़ा आणि देवकू काठय़ा या आदिवासी महिलांनी प्रांताधिकारी कोकण भवन आणि अप्पर जिल्हाधिकारी अशा विविध कोर्टात सतत आठ वर्षे न्यायालयीन संघर्ष केला होता. तर आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष भरत वायडा, तालुका सचिव डॉ. सुनील पेहाड यांनीही वेळोवेळी हा मुद्दा लावून धरला होता. अप्पर आयुक्त कोकण विभागाने २००३ साली तहसीलदार डहाणू आणि प्रांताधिका-यांना अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र गाळेधारकांनी या आदेशाच्या विरोधात दिवाणी न्यायालयात जाऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत कारवाईला आडकाठी घातली होती.
hi tar survat aahe, ajun khup sare kahi karyache aahe. chala ekatra ya, let us do it together!