मुंबई विद्यापीठातील परीक्षेनंतर पुनर्मूल्यांकन, त्यासाठीचा रखडलेला निकाल, हॉलतिकीट आणि गुणांमध्ये होणा-या चुका आदींमुळे असंख्य विद्यार्थ्यांना होणारा त्रास विद्यापीठाने कमी करण्यासाठी पाऊल उचलेले आहे.
मुंबई – मुंबई विद्यापीठातील परीक्षेनंतर पुनर्मूल्यांकन, त्यासाठीचा रखडलेला निकाल, हॉलतिकीट आणि गुणांमध्ये होणा-या चुका आदींमुळे असंख्य विद्यार्थ्यांना होणारा त्रास विद्यापीठाने कमी करण्यासाठी पाऊल उचलेले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागात येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विद्यापीठाने येत्या मंगळवारी, २७ जानेवारी रोजी विद्यार्थी दरबार आयोजित केला आहे. या दरबारामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रश्न त्याच ठिकाणी सोडविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सध्या ७२९ महाविद्यालये असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हॉलतिकीट, नावांमधील चुका, गुणांमधील तफावत, पुनर्मूल्यांकन आदी विविध कारणांसाठी विद्यापीठात यावे लागते. मात्र अनेकदा चकरा मारल्यानंतरही विद्यार्थ्यांचे काम होत नसल्याने अनेकांना याचा फटका बसतो. यामुळे विद्यापीठाने यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी, समस्या निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन समोरच त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून पहिल्यांदाच विद्यार्थी दरबार आयोजित केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.
ठिकाणाची लवकरच माहिती
विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी विद्यापीठाने घेतलेल्या मोहिमेचा भाग म्हणून होत असलेल्या विद्यार्थी दरबाराचे स्वरूप हे केवळ अधिकारी आणि विद्यार्थी असे न ठेवता या दरबारामध्ये संबंधित विभागाचे विभाग प्रमुख, प्र-कुलगुरू आणि परीक्षा नियंत्रक उपस्थित राहणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलामध्ये हा दरबार भरणार असून याचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाकडून देण्यात आली.
मुंबई विद्यापीठात विद्यार्थी दरबार भरणार, त्यामुळे विद्यापीठाशी संलग्नित विद्यार्थी आपल्या समस्या अधिकार्यांजवळ मांडतील आणि त्यांना त्यांच्या शंकेचे निरसन होईल. अर्ज भरतेवेळी विद्यार्थ्यांना वेळोवेळी नक्कल प्रतची आवश्यकता लागते, त्यामुळे त्यांना संकुलनाच्या बाहेर किमान रु,२०/- रिक्षा भाडे करून जावे लागते, त्यामुळे विद्यापीठाने स्वताचे “Xerox Machine” संकुलनात ठेवावे. म्हणजे विद्यार्थ्यांना रु.१/-चा जेथे खर्च येतो तो साधारण रु.२१/- देऊन पूर्ण करता येऊ नये. हे एक साधारणशे उदाहरण आहे, परंतु ह्याहून अवघड समस्याही अधिकाऱ्यांमार्फत पूर्ण करता येतील याबद्दलची हमी विद्यार्थी दरबारातून विद्यार्थ्यांना मिळावी. मगच त्या विद्यार्थी दरबाराचा सदउपयोग विद्यार्थी वर्गास होईल.