दु:ख अनावर झाल्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्या दु:खाची परिस्थिती माणसांगणिक बदलत असते. प्रत्येकाला तो क्षण दु:खाचा डोंगरच वाटत असतो. त्यातून सावरला तो जगला आणि ज्याला हा दु:खावेग आवरता आला नाही तो हरला. त्या हरण्यामुळे कुणाला हृदयविकाराचा धक्का बसतो. कुणी आत्महत्या करतो.. शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. विद्यार्थी अपयश आले म्हणून आयुष्य संपवतात. तरुणाईचा प्रेमभंग होतो. असाच प्रेमभंग प्रसिद्ध अभिनेत्री जिया खानचा झाला.. प्रियकराने छळले, दगा दिला आणि जियाने गळफास लावून घेतला.. नव्या चित्रपटाच्या अभिनयाने जी प्रसिद्धी माध्यामात पुन्हा झळकायला हवी होती, तीच जिया तिच्या अकाली मृत्यूने माध्यमांच्या बातम्यांची विषय झाली.. आत्महत्या हे दु:ख संपवण्याचा इलाज नव्हे.. असे अपयशाचे दु:ख पांघरण्यापेक्षा त्या परिस्थितीत सावरण्याचे बळ आयुष्यात प्रत्येकाला कमावता आले पाहिजे.
आयुष्यात आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक जण जगत असतो. तो आनंद खुणावतो. त्यासाठीच माणूस रात्रंदिवस कष्ट उपसत असतो. पैसा कमवत असतो. माणसांशी नातं विणत असतो. प्रेम करत असतो. माणसावर जीव लावत असतो.. कुणावर तरी जीव ओवाळून टाकत असतो. प्रसिद्ध अभिनेत्री जिया खानने सूरज पंचोलीवर असाच जीव लावला होता, असं तिने लिहून ठेवलेल्या पत्रामधून उजेडात आलं आहे. या पत्रामध्ये व्यक्त झालेल्या भावभावना जियाच्या मनात दाटलेल्या दु:खाची कारणं सांगणा-या आहेत. सूरज ज्या क्षणी तिला टाळायला लागला, त्या बोचणा-या क्षणांची मनोवस्था तिने पत्रातून व्यक्त केली आहे. तिचा झालेला कोंडमारा अनेक उदारहणे देऊन आत्महत्येनंतरच्या चौकशीसाठी एक पुरावा जगाचा निरोप घेताना सोडला आहे. सूरजने टाळले म्हणून जियाने आत्महत्या करणे, हे कारण तिच्या पत्रातील मजकुरामुळेच अधोरेखित झाले आहे.
प्रेमभंगामुळे आत्महत्या करण्याच्या घटना जगभरात घडत असतात. त्या सातत्याने कानावर येतात. त्यातही जियासारख्या सिलेब्रिटीची आत्महत्या प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधून घेतात. प्रेम या सुंदर संकल्पनेला असे गालबोट लागण्याचे मूळ कारण ‘प्रेमभंग’ असते. आयुष्यात प्रत्येकाला आपल्या भावना, सुख-दु:ख शेअर करण्यासाठी एक जोडीदार लागत असतो. त्या जोडीदाराने आपल्याला समजून घेतले पाहिजे, वेळ दिली पाहिजे, संवाद साधला पाहिजे, अशी अपेक्षा या प्रेमसंबंधात दडलेली असते. हे सुख-दु:ख शेअर करताना ते जवळ येतात. भावनिक पातळीवर या जवळ येण्याला कुणाचाही आक्षेप नसतो. कारण त्यात मित्रत्वाचा सच्चेपणा असतो. पण त्या जवळीकतेमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले की आक्षेप नोंदविला जातो. पुरुष-स्त्री नातेसंबंधातील एक सीमा आपण नकळतपणे ओलांडली आहे, याची भीती त्या जोडीदारांच्या मनातही घर करते. त्याच भीतीतून आता आपण सोबत राहिलेच पाहिजे असे हट्टाचे घर तयार होते. त्यातून एक जोडीदार जेव्हा बेइमान होतो. सा-या आणाभाका विसरतो. दिलेले वचन मोडतो. दुरावा येतो. तेव्हा आपण कुणासाठी जगायचे असा प्रश्न अस्वस्थ करू लागतो. यातून सावरणे कठीण झाले की मनात आत्महत्या करण्याचे पक्के घर बांधले जाते. हेच घर जियाच्या जाण्याचे कारण आहे.
‘तारुण्याच्या उंबरठयावर हजारो लहरी येतात, त्याचप्रमाणे वाहत गेल्यास त्या दु:खाला कारणीभूत ठरतात.’ हे तरुणाईने आपल्या आयुष्यात कायमचे ध्यानात ठेवले पाहिजे. आयुष्यात अनेकदा प्रत्येक जण कधीतरी घसरत असतो. कोसळत असतो. सावरत असतो. त्या घसरण्यातूनच पुन्हा आपला पाय घसरू नये, याची काळजी घेत असतो. एकदा पाय घसरल्यानंतर सावरण्याचे बळ आपल्यात असले पाहिजे. फसव्या, क्षणिक सुखांच्या लहरींसोबत वाहत जाताना भानावर आले पाहिजे. हे भान आपल्याला समाज देत असतो. ती समाजाने दिलेली समज असते. ती झुगारली की आयुष्याचे वाटोळे होते, हे जियाच्या ‘प्रेमभंगा’तून आपण शिकायला हवे. जियाने पत्र लिहून ठेवलीत म्हणून तिच्या जाण्याचे, तिच्या दु:खाचे कारण समाजासमोर आले. मोबाइल आणि सोशल नेटवर्कचे जाळे असतानाही तिने पत्र हेच प्रभावी माध्यम मानले. त्यामागे तिचा काय हेतू असेल, हे तिच जाणो.. पण प्रेमसंबंधात वाहून जाऊ नये, एवढा मंत्र तिने जाता-जाता तरुणाईला दिला आहे, त्याचा विसर कुणाला पडू नये.
चित्रपटतारका, त्यांचे जगणे, त्यांचे संबंध या सा-यांबद्दल एक आकर्षण असते. ते आकर्षण जियाबद्दलही होते. मोजक्या चित्रपटातून तिने केलेल्या लक्षवेधी भूमिका, अमिताभ बच्चनसारख्या स्टारकास्टसोबत सुरुवातीलाच काम करण्याची संधी आदी सारी जियाची चित्रपटसृष्टीतील बलस्थानं मानली गेलीत. त्या भूमिका जगताना तिने कुठलीही कसर सोडली नाही. पण एक पाऊल चुकले आणि तिला जगणे नकोसे झाले. भूमिकांमधून समाजमनाला जगण्याचे बळ देणा-या सिनेकलावंतांना अशा चुकीच्या वाटेने जावे लागणे, रसिकांसाठी धक्कादायक असते. त्यातही प्रेमासाठी वाट्टेल ते करताना अशी जगण्याची इच्छा मरून जाणे, बरे नव्हे.
जियाच्या आत्महत्या प्रकरणाला वेळोवेळी वेगवेगळे वळण मिळत गेले. प्राथमिक अंदाजात तिला अलीकडच्या काळात चित्रपट मिळत नसल्याने ती अस्वस्थ होती, हे कारण सांगितले जात होते. हळूहळू या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळत गेली आणि आता तिची आत्महत्या ही ‘प्रेमभंगा’मुळे झाली इथवर येऊन थांबले आहे.
तपासात आणखी काही वेगळे तथ्यही बाहेर येईल. एखाद्या चित्रपटातील कथेने रसिकांना गुंतवून ठेवावे, असेच जियाच्या आत्महत्येमागचे कारण शोधताना धक्क्यांवर धक्के दिले आहेत. कालांतराने या सत्यकथेवरही एखादा चित्रपट येईल आणि जियाच्या दु:खाचे कारण रसिकांना काहीतरी शिकवून जाईल, ही अपेक्षा व्यर्थ ठरू नये.
खरी वस्तुस्थिती –पहिल्याच सिनेमात बिग बींसमोर दमदार काम केल्यानं जिया चांगलाच भाव खाऊन गेली होती. या सिनेमासाठी तिला ‘ फिल्मफेअर ‘ चं नामांकनही मिळालं होतं जियाने अमिताभ, आमीर खान यासारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केल्यानं तिच्या आशा उचावल्या होत्या. तिला मोठं काम मिळवण्याची तिची इच्छा होती. म्हणून गेल्या तिन वर्षापासून ती धडपड करत होती. मात्र तिला कोणतंही मोठं काम मिळालं नाही म्हणून ती नाराज होती, असे जिच्या आईने सांगितले. नुकतीच जिया हैदराबादमध्ये एक ऑडिशन देऊन आली होती, मात्र तिथेही तिची निवड झाली नाही. एक्सबॉयफ्रेंड उदयपूरचे युवराज लक्ष्यराजसिंह यांचाही अलिकडेच दुस-या मुलीशी साखरपुडा झाला. मागील तीन वर्षात एकही नवी ऑफर न मिळाल्याने जिया मानसिकदृष्या खचली होती. तिच्यात एकाकीपणाची भावना वाढत होती. त्यामुळेच दर तासाला बॉयफ्रेंड सूरजशी बोलण्याची तिची इच्छा होती या सर्व घटनांमुळे निराश झालेल्या जियाने जुहू येथे सागर संगीत बिल्डिंगमधील राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त.
प्रत्येक मुलिने धडा घ्यावा अशी हि घटना आहे, लग्नाआधी सेक्स करु नये. गोव्यापासून सगळीकडे हनिमून करून आल्यानंतर प्रेग्नंट राहिल्यानंतर गर्भपातही करून झाला निर्लाजपणाची हद्द… तरी आईचे डोळे उघडले नाहीत… हे आमच्या सोसायटीत आजून तरी सुदैवाने नाही आणि आता सगळे करून भागल्यानातर कोणी विचारात नाही म्हणून आत्महत्या केली आता आई त्यावर सहानुभूती आणि पैसे कमवायला लागलीय.सुदैवाने आपल्या समाजात तरी अशी आई अजून झाली नाहि.
त्याला रंगीला म्हणताना हिने किती जनाबरोबर रंग उधळलेत हे आईलाच काय तिला स्वतःला सुद्धा आठवत नसेल. म्हणूनच आधीच्या दोन्ही बॉयफ्रेंड नि तिला सोडले कशावरून नसेल पण आता सहनुभूतीपायी कोण कसे बोलणार. अशाप्रकारे मुलीनी ब्लेकमेल करण्याचे प्रकार आजकाल फारच वाढले आहेत