अवयवदान केल्यास पुनर्जन्मानंतर दान केलेल्या अवयवांशिवाय त्यांचा जन्म होईल, अशी भीती आजही अंधद्धेला खतपाणी घालत आहे.
मुंबई- पुनर्जन्माबाबत लोकांच्या मनात आजही संभ्रम आहे. अवयवदान केल्यास पुनर्जन्मानंतर दान केलेल्या अवयवांशिवाय त्यांचा जन्म होईल, अशी भीती आजही अंधद्धेला खतपाणी घालत आहे.
हृदयप्रत्यारोपणासाठी रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय सहसा तयार होत नाहीत. लोकांत पसरलेला चुकीचा समज त्याला कारणीभूत ठरत आहे.
अवयवदानानंतर पुनर्जन्म झाल्यास यकृत किंवा किडनी आदी अवयव आपल्याला नसतील. त्याशिवाय धर्मात अवयवदानाबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अवयवदान केल्यास धर्माविरोधात गेल्यासारखे होईल, असे काहींना वाटते. त्यामुळे भारतात हृदय प्रत्यारोपण करणा-यांची संख्या खूपच कमी आहे, अशी माहिती ग्लोबल रुग्णालयाचे डॉक्टर ताहेर अहमद शेख यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली. आपल्या देशात नेत्रदान आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जात असले तरी अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळू शकते, याविषयी जनजागृती होणे गरजेचे झाले आहे.
भविष्यात भारतात मृत्यूनंतर केवळ यकृत, किडनीचे प्रत्यारोपण होणार नव्हे तर हृदयाचेही प्रत्यारोपण होणे शक्य आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे.
हृदय प्रत्यारोपणाच्या तुलनेत यकृत आणि किडनी प्रत्यारोपण करणा-यांची संख्या जास्त आहे. इतकेच नाहीतर सध्या काही रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था हृदय प्रत्यारोपणाबाबत जगजागृती सुरू असल्याचे डॉक्टर शेख यांनी सांगितले.
जनजागर सुरू
भारतात हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण खूप कमी होते. फक्त चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण उत्तम होत आहे. हॉर्ट सर्जन आणि इतर डॉक्टर हृदय प्रत्यारोपण मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाहीत. काही स्वयंसेवी संस्था यासाठी काम करत आहेत. या संस्था केवळ भारतातच नव्हे तर देशातील विविध भागात अवयवदान करण्यासाठी जनजागर करत आहेत.
भारतात हृदय प्रत्यारोपण करून प्रोत्साहन देणा-यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे भारतात सर्जरीचे प्रमाण हातांच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहे. हृदय प्रत्यारोपण करणा-यांत काडियोलॉजिस्ट महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. आपल्या देशाच्या तुलनेत विदेशात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे हृदय इतर व्यक्तीला देण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने आपल्या देशातील प्रमाण शंभरात एक असेच आहे. – डॉ. जितेश देसाई, कार्डियोलॉजिस्ट, हर्षल हार्ट हॉस्पिटल
हृदय प्रत्यारोपण सहजासहजी उपलब्ध झाल्यास ,किडनी बिझनेस सारखा ,हृदयाचा बिझनेस सुरु होयील,अपघातात जखमी झालेल्या दुर्दैवी व्यक्तींचे ,अथवा दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींचे,पैशांचे लोभाने हृदयच गायब होईल ,र्हुदयाची सौदेबाजी सुरु
होईल ,आणि मग जगणारा मरेल,आणि मरणारा जगेल,…….