सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. मंत्रालयात विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली, त्यावेळी रामदास कदम बोलत होते.
दिल्ली एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीही कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही फटाके विक्रीला बंदीची शक्यता आहे.
मंत्रालय परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ देण्यात आली.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, फटाक्यांच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेक लोकांच्या कानांचे पडदे फाटतात, तसेच धुरामुळेसुद्धा वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. फटाक्यांमुळे कंपन्यांना आग लागल्याचे प्रकारही समोर आले आहेत. फटाके फोडण्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढून ओझोनच्या थरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. रामदास कदम यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात फटाक्यांविना दिवाळी साजरी करू या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रदूषण फक्त दिवाळीत फटाके उडवले कि होते का ?
HAPPY NEW Year करत जेवहा नाचत फटाके उडवत तेव्हा नाही होत का ?
३१ डिसेंबर ला जगभरातले सर्वे देश फटाके उडवतात , तेव्हा global worming होत नाही आणि
दिवाळीत जगातील फक्ते एक भारत देश फटाके उडवतो तेव्हा प्रदूषण होते का ?……वा वा वा छान लॉजिक आहे.
पर्यावरणमंत्री आणि प्रदूषणा वर बाता मरणाऱयांनीही जरा उत्तरे दयावी ……!!!!