जपानमध्ये ढोल बडवून देशात महागाई कमी होणार नाही की वीजेची समस्याही सुटणार नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
अमेठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये ढोल बडवून देशात महागाई कमी होणार नाही की वीजेची समस्याही सुटणार नाही, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
मोदी सरकारने १०० दिवस पूर्ण केले असले तरी निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने ते विसरले आहेत. भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर बेंबीच्या देठापासून ओरडणारे आता मूग गिळून गप्प बसले आहेत, असेही ते म्हणाले. राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठी दौ-यावर आले आहेत. यावेळी तेथील लोकांनी वीज टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्याची विनंती केली. यावेळी राहूल यांनी मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टिका केली. केंद्रातील एनडीए सरकारने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली होती. त्याचा विसर त्यांना पडला आहे. पंतप्रधानांनी भ्रष्टाचार आणि महागाईच्या विरोधात लढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदी सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदी पाच दिवसांचा जपान दौरा आटोपून बुधवारी भारतात परतले. तेथे त्यांनी पाच दिवसात भाषणे दिली आणि ढोल बडवून छायाचित्रकारांना विविध प्रकारच्या पोज दिल्या. तर टोक्यो येथे भारतीय दुतावासात सुरक्षाकवच मोडून रस्त्यावरील त्यांच्या चाहत्यांना भेटले. या दरम्यान त्यांनी ३४ बिलीयन डॉलरची भारतात गुंतवणूक करण्याचे विविध प्रकल्प राबवणार असल्याचे समजते. यात गंगा नदीच्या स्वच्छतेचाही समावेश आहे. मोदींनी मी गुजराती आहे. पैसा माझ्या रक्तातच आहे. मला व्यवसाय समजतो. म्हणूनच जपानी उद्योजकांना रेड टेप नव्हे तर आपण रेड कारपेट अंथरणार असल्याचे मोदींनी सांगितले आहे. जपानी उद्योजकांसमोर कारपेटच्या पायघड्या अंथरणा-यांनो आधी देशातील वीजटंचाई सारखी भीषण समस्या सोडवा, असा टोलाही राहुल यांनी लगावला.
आणि आता पप्पू बोलायला सुद्धा लागला
अरे मंदबुद्धी ते तुझ्या डोक्या बाहेरच आहे ,मोदींनी जपानहून तुझ्यासाठी मनमोहन अंकल सारख लोलीपोप नाही आणल म्हणून रागावलास वाडत….:)
त्याच्या आइला ! तुझ्या आई नि बापाने गेल्या ५०,वर्षांत काय केले ते सांग अगोदर ,आणि मग
मोदींच्या नावाने खडी फोड ,!!
विजेची टंचाई गेल्या दहा वर्षात का संपुष्टात आली नाही? वीज साम्सेय्वर गेल्या ६० वर्षात कोणते प्रयत्न झाले? उगाच फालतू टीका करयची? पृथ्वी बाबा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे अंधारात लोडशेडिंग करत होतात त्यावर बोलतील काय? नवीन बाळाला साठ वर्ष्यांचा नव्हे १२५ वर्षारचा म्हातारा काय सांगतो आहे? अरे तू आलास बरे झाले बाबा पण जन्माला आला तर परमेश्वर बनून मला १०० दिवसात सोन्याची अंडी दे. मी तर अगोदर सर्व लुबाडून खावून बसलो आहे त्यामुळे भिकारी झालो आहे.
पप्पू ला काही काम धंदे नाही आहेत…