‘मी मर्यादेपेक्षा जास्त बोललो’ अशी कबुली देत भाजप नेते चंदन मित्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
नवी दिल्ली – ‘मी मर्यादेपेक्षा जास्त बोललो’ अशी कबुली देत भाजप नेते चंदन मित्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मित्रा यांनी सेन यांच्याकडे ‘भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली होती.
डॉ. अमर्त्य सेन यांनी भारतरत्न पुरस्कार परत करावा या चंदन मित्रा यांच्या मागणीशी पक्षाचा काहीही संबंध नसून ही त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर मित्रा यांनीही शुक्रवारी ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत होते, असे सांगत पक्षाचा या वक्तव्याशी संबंध नसल्याचा खुलासा केला.
मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून मला नको या सेन यांच्या वक्तव्यानंतर मित्रा यांनी सेन यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. सेन हे मागासलेले अर्थतज्ज्ञ झाले असून, त्यांनी राजकारणात येऊ नये असा सल्ला देत, मित्रा यांनी त्यांच्याकडे भारतरत्न परत करण्याची मागणी केली होती.
आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो . आणी लोकशाहीत मत ,विचार आणि लेखन स्वातंत्र्य आहे . तसेच ते नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यानाही आहे . आपल्या मनासारखे ते बोलले अनहित म्हणून त्यांचे भारत रत्न मागणे योग्य नाही . तो भारत रत्नाचाच अपमान ठरेल .