नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदीबाबत संसदेत बोललो तर भूकंप होईल, असे वक्तव्य कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले.
नवी दिल्ली- नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नोटाबंदीबाबत संसदेत बोललो तर भूकंप होईल, असे वक्तव्य कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. मला बोलण्यापासून रोखले जात आहे. बोलण्याची संधी दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे बसणे अशक्य होईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मागील महिनाभरापासून मी नोटाबंदीवरील चर्चेसाठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकार चर्चेपासून पळत आहे.
नोटाबंदीबाबत गरिबांच्या मनात काय आहे, याबाबत मी संसदेत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मला जर बोलू दिले तर नोटाबंदी काय आहे, त्याचा फायदा आणि नुकसान कोणाला यावर मी प्रकाशझोत टाकणार आहे. ज्यामुळे संपूर्ण देशाला याबाबत कल्पना येईल. पंतप्रधानांनी मोठा घोटाळा केला असून याबाबत मला सर्वाना सांगायचे आहे. मात्र मला थांबवले जात आहे. मी जर काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या तर भूकंप होईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी, पंतप्रधान देशभर भाषणे देत फिरत आहेत. परंतु लोकसभेत यायला ते घाबरत आहेत. त्यांना घाबरण्याचे काय कारण आहे, असा सवालही उपस्थित केला.
रडा आता… कसा पैसे बाहेर येणार…