अवयवदानाबाबत समाजात अजूनही गैरसमज आहेत. या गैरसमजांना दूर करण्याकरता तसे प्रयत्नही केले जात आहेत.
मुंबई – अवयवदानाबाबत समाजात अजूनही गैरसमज आहेत. या गैरसमजांना दूर करण्याकरता तसे प्रयत्नही केले जात आहेत. नुकतेच ठाण्यातील एका दहा वर्षाच्या मुलीने अवयवदान केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
हेमांगी सामंत-प्रभावळकर या त्यांच्या १८ वर्षाच्या मुलीला अचानक तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. हेमांगीला तात्काळ उपचाराकरता लीलावती रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने हेमांगी कोमामध्ये गेली. तिच्या मेंदूत रक्तस्त्राव( ब्रेन हॅमरेज) झाला आणि दुस-या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. पण तिचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत होते. दुर्देवाने हेमांगीचे निधन झाले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. आपल्या मुलीच्या अवयवाचा दुरुपयोग होणार नाही, अशी भीती त्यांना होती. मात्र डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. हेमांगीची किडनी, लिव्हर आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला.
Kharch atishay yogya ase nirnay ya bikat paristhit ghene kadhin asate. Nirmalajini ek changla nirnay gheun adarsh samor dhevala ahe.
Kharch atishay yogya ase nirnay ya bikat paristhit ghene kadhin asate. Nirmalajini ek changla nirnay gheun adarsh
अजित बिलोलीकर, जमशेदपूर