Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमध्यंतरसुखदाकाल आणि आज काय उणे काय घेणे

काल आणि आज काय उणे काय घेणे

सकाळी उठल्यापासून कानावर पडणारे शब्द.. संस्कार, संस्कृती, भारतीय विचार. सभोवतालचं सर्वच वातावरण पाश्चात्त्य संस्कृतीच्या चुकीच्या प्रभावाने झपाटलेलं आढळतं. राहणीमान, जीवनपद्धती व संस्कार सर्व बाबतीत या पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव जाणवतोय व मग माझ्यासारख्या नव्वदीला पोहोचलेल्या स्त्रीला चुकल्यासारखं वाटतं.. वाटतं, कशाला म्हणायचं भारतीय?

१९२२ सालात जन्मलेल्या माझ्या पिढीतल्या स्त्रीला आधुनिक काळातले बदल तीव्रतेने जाणवतात. आमच्या वेळचं जीवनमान सरळ साधं. जवळजवळ ६० सालापर्यंतच्या पिढय़ांनी एक सांस्कृतिक व कौटुंबिक समृद्धी अनुभवली असं फार आनंदानं व मनापासून नमूद करावंसं वाटतं. १०-१५ सदस्यांचं एकत्र कुटुंब, त्यात सर्वच मिळून मिसळून आनंदाने साजरं करण्याची वृत्ती. यात काटकसर, दानधर्म, शेजारधर्म घरातील वडीलधा-यांनी सांगितल्याप्रमाणे कुलाचारांचं पालन, सर्वच सहज पाळलं जायचं. मुळातच माणुसकी, सर्व नात्यांबद्दल आपुलकी, आदर व कृतज्ञता मनी आपसूक रुजली जायची. व्यवहारी वृत्ती, समंजसपणा, यासह वडीलधा-यांच्या आज्ञेत वागण्यात धन्यता व कृतज्ञता वाटावयाची असा काळ. घरातील सदस्यांबरोबरच घरातील पाळीव प्राणी- गोठय़ातील गाय, म्हैस, वासरू, शेतावरील बैलांची जोडी, राखणदार कुत्रा सर्वानी व्यापलेलं, चैतन्याने भरलेलं त्या काळचं घर म्हणजे सर्वार्थाने ‘वृंदावन’ वाटायचं.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खूप आमूलाग्र बदल होत गेले. सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच बाबतीत क्रांतिकारी वाटावे असे बदल. कारण प्रत्येक कुटुंबात ते बदल व त्यांचे परिणाम दिसून येऊ लागले. रोजगाराच्या संधी वाढल्या, पगार वाढले, एक आणे, दोन आण्यांचे व्यवहार रुपयांत होऊ लागले. (महागाई आली.) स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारं सर्वार्थाने खुली झाली. घराचा उंबरठा ओलांडून स्त्रिया बाहेर पडू लागल्या.
पुढच्या काळात आणखीन वेगळं चित्र उभं राहिलं ते विभक्त कुटुंब पद्धतीने. सोप्या भाषेत सांगायचं तर तडजोड करावी लागू नये म्हणून वेगळं बि-हाड मांडलं जाण्याकडे कल वाढला. त्याचबरोबर बरीचशी कामं जी घरातील कर्ती स्त्री स्वत: करायची ती सोपी करायला वेळ व श्रम वाचवायला यंत्रं आली. स्वयंपाकघरातील पाटा, वरवंटा व जात्याची जागा मिक्सर, घरघंटी इ. सारख्या इलेक्ट्रिक मशिननी घेतली. चुलीऐवजी गॅस सिलिंडर आलं. विहिरीचं पाणी ओढणं बंद होऊन घरोघरी नळ आले. श्रम वाचले.

आम्ही विचार करतो की, श्रम तर वाचले, पण चुलीवर शिजवलेल्या स्वयंपाकाची चव व एकत्र कुटुंबाचं समाधान कुठेतरी हरवलं. बायकांना घरातील सर्व कामं, झाडलोट, पाणी भरणं यातून सतत आपोआप व्यायाम होत होता. तो थांबत जाऊन आज सर्वच अ‍ॅटोमॅटिक झालंय. जागेवरून उठायचेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्वच काही कंट्रोल बाय रिमोट. परिणाम काय, तर अनेक शारीरिक व्याधी जडून डॉक्टरचा खर्च वाढलाय. कारण नैसर्गिक जीवनशैलीपासून आपण अधिकाधिक तोडले जातोय. वरवर पाहता ‘ऐहिक’ सुख खूप मिळत असलं तरी हे सुखच मारक ठरतंय की काय, अशी शंका वाटू लागते. मग आम्हा ज्येष्ठ स्त्रियांचं मन आपसूक जुन्या काळात रमतं. तुलनात्मक विचारातून आम्ही काल व आज अनुभवतोय. आम्ही हट्टीपणा करून सर्वच बाबतीत जुन्या जीवनशैलींचा आग्रह तर धरू शकत नाही. काही बाबतीत हा हट्ट प्रत्यक्षात येणं शक्यही नाही हेही खरं, पण काही बाबतीत मात्र हे बरोबर की चूक, असा प्रश्न पडतो.

आम्ही पाहतो की, आजच्या पिढीच्या राहणीमानात खूप फरक पडलाय. नव्या जमान्याबरोबरीने राहायला हवं हे मनालाही पटतं. शिवाय आपल्या वेळी मोठय़ांच्या धाकात आपली हौस-मौज करायची राहिली. काही बाबतीत ती या पिढीला जगता येतेय तर त्यांना त्याचं स्वातंत्र्य अनुभवू दे, असंही कुठेतरी वाटतं.

सवयीही सहज बदलल्या आहेत. आज घरोघरी टीव्हीसमोर जेवणं होतात. घरपण, घराची शिस्त, अन्नाचं पावित्र्य हे विचार मागे पडलेत. घरातली लहान मुलं-मुलीसुद्धा शाळा, परीक्षा, शिकवणी यामुळे सतत घराबाहेर. त्यांची मित्रमंडळी, पाटर्य़ा, ट्रीप हेच जग. घराबरोबर सण-समारंभ, कार्यातही एकत्र वेळ द्यायला ती मुलं फ्री नसतात. सणांना घरची मुलबाळंच घरी नाहीत, उशिरा येतील तोवर दिवस संपूनही जाईल. मग आम्हा आजी-आजोबांचं मन थोडंसं का होईना खट्टू होतं. घरची लहान मंडळी घरी नाहीत म्हणजे घरातलं चैतन्यच नाही, असं वाटतं.

आजची तीव्र व भरीची (वाढत जाणारी) सामाजिक तसंच कौटुंबिक बाब म्हणजे स्पर्धा. लहान पिढीबाबत तर केजीपासून म्हणजे आजकाल तर अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुरडय़ांनाही शाळेत अ‍ॅडमिशनसाठी ‘वेगळेपण’ दाखवावं लागतं. पालकही इतरांसारखे आपल्या मुलांचं सर्व व्हावं यासाठी महागडी बेसुमार फी भरून इंग्रजी माध्यमाची शाळा मुलांसाठी निवडतात. पालकच आपसूक मुलांना आपली मातृभाषा वापरण्यात कमीपणा, आणखी हाव/ चंगळवादी सवयी लावताहेत असं वाटतं. मुलांना हवे ते मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट, आयपॅड, कॅमेरे तासन् तास फेसबुक सर्व उपलब्ध करून देतात. पूर्वीच्या काळासारख्या कमी गरजा, साधी राहणी हे सर्व नामशेष झालंय. आजकाल कोणाची हौस भागतच नाहीये. महागाई वाढतेय, सर्व वस्तूंचे दर गगनापार झालेत तरीही उपभोग्य वस्तूंवरील खर्चाचा काहीही हिशेब राहिलेला नाही.

पूर्वी गावाकडे मोठे वाडे, तर मुंबईसारख्या भागात चाळी असायच्या. आसपासचे सर्व शेजारीही एक कुटुंब असल्याप्रमाणे राहायचे. आज शेजारचं दारही उघडलेलं दिसत नाही (फ्लॅट सिस्टीममुळे), तर माणसं कशी दिसणार. शेजारधर्म रुजायला परस्परसंवाद होतच नाहीत. फक्त सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विसंवाद होतात. हौस इतकी, पण कशात समाधानी वृत्ती नाही. निखळ आनंद नाही. कशावरही अंकुश नाही. संस्कार, आदर, रीतीरिवाज, बंधनं नकोशी वाटतात.

एक किनारा सोडला, पण दुसरे रीतीरिवाज एकदम मानवत नाहीत, जमत नाहीत. दुसरा किनारा गाठेपर्यंत नावेची होणारी ही डगमग सांभाळावीच लागणार. मधल्या पिढीतल्या पुरुषांना वाटतं की, ते मोठय़ा कुटुंबात राहिले, मग घरातील लहान भावाबहिणींचं शिक्षण, लग्न इ. जबाबदारीमुळे लवकर नोकरी धरली. उच्च शिक्षणाची इच्छा असूनही जबाबदारीपुढे इच्छा मनातच राहिली. तर मधल्या पिढीतल्या स्त्रियांना वाटतं, लवकर लग्न करून रांधा, वाढा, मुलांच्या गोंधळात मला कितीतरी गोष्टी करता आल्या नाहीत. या आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मधल्या पिढीने आजच्या पिढीला देऊ केलं आहे. त्यांना हवं ते मिळावं यासाठी पाठिंबा, आर्थिक मदत व मनापासून कौतुक या पिढीला मिळतंय, पण कितीतरी घरी लहान मुलं सहज म्हणून जातात की, ‘आमचे आई-बाबा आम्हाला समजूनच घेत नाहीत.’ याउलट ‘ते जे करतात ते त्यांचं कर्तव्यच आहे,’ असे खडे बोलही सुनावतात.

आजही घरं ही सर्व आधुनिक सुखसोयींनी भरलेली. उच्चशिक्षित पालक, भरपूर पैसा, घरात लाडाकोडांचा एकच मुलगा किंवा मुलगी. मग त्यांना हवं ते देण्याची पालकांची तयारी. पैशांचा, किमतीचा विचार नाही, यामुळे या पिढीला ‘नाही’ ऐकण्याची सवयच नाही. मनावर ताबा नाही. राहणं, वागणं वाटेल तसं, कुणाच्याही भावनांचा विचार नाही. काही म्हटलं तर हीच आजकालची फॅशन आहे, असं उत्तर तयार.

शिक्षण, विचारस्वातंत्र्य, पैसा इ.चा उपयोग करून उच्चविद्याविभूषित व्यक्तीने कुळाचा/ घराचा उद्धार केला, तर गौरव होतोच व आशीर्वादही मिळतातच. आजच्या पिढीतले १००पैकी ३० जण संस्कारांना धरून आहेतच. पण उरलेल्या सत्तर जणांची जी तरुणाई आहे त्यातले बरेचसे जण बेलगाम, दिशाहीन, भरकटलेल्या बोटीप्रमाणे, आयुष्याचं वाटोळं झालेलेही आहेत. हे चित्र पाहिलं की खेद वाटतो.

वृत्तपत्रांत पानन् पान भरून गुन्ह्यांच्या, खून, बलात्कार, क्रूर हत्यांच्या, फसवणुकीच्या बातम्या, गुन्हेगारी सर्व सामाजिक थरांत सर्व नात्यांच्या मर्यादा ओलांडून पोहोचली असल्याने धक्कादायक वर्णन वाचलं की, अंगावर काटा उभा राहतो.

प्रेमभंग, लग्नाआधी गर्भधारणा, गर्भपात (अ‍ॅबॉर्शन) हे प्रकार तर चालूच आहेत. पण यांचा परिणाम असा की, त्या मुली नंतरही संसारात समाधानी राहात नाहीत. लहान वयातली प्रेमप्रकरणं व पुढे लगेच लग्नबंधनात पडलेली कित्येक तरुण जोडपी लग्नानंतरच्या जबाबदा-या पेलू शकत नाहीत. घर म्हणायला दोघांचाच संसार, वाढत्या गरजा, लाखांचा पगारही अपुरा, त्यात एकमेकांचे इगोज, करिअर्स यामुळे अशांती, तणाव सततचा, याचाच परिणाम हल्ली डिप्रेशनच्या केसेस, वाढते घटस्फोट,आत्महत्या इ.सारख्या समस्यांत होतोय. या समस्यांवरचं खरं समाधान पूर्वीच्या ‘भारतीय जीवनपद्धती व संस्कारात’च दडलं आहे. आज बाबा-बुवा, महाराज, माताजी पूर्वीच्याच अमूल्य भारतीय संस्कारांचं मार्केटिंग करून आजच्या पिढीला देताहेत आणि आजच्या काळात पुन्हा जुन्या काही संस्कार, प्रथा पण एका नवीन स्वरूपात, नवीन तत्त्वज्ञानातून ऐकायला व पाहायला मिळतात. सभोवतालचं जग पाहिलं की, आम्हाला वाटतं, गेल्या ७० वर्षात जी काही प्रगती झाली, त्यामुळे आपण सुधारून वरवर चढतोय की, गडगडत खाली येत आहोत?

तीन पिढय़ा पाहिलेल्या आम्हाला वाटतं की, कुटुंबातलं वातावरण जसं असेल तशी पिढी घडत असते. लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार, शिस्त बाणवणं आवश्यक आहे. आजची कर्ती पिढी तशी निर्भय व धाडसी आहे. आत्मविश्वासाने करिअर निवडते, उच्च शिक्षणात अग्रेसर राहते. भारतात, परदेशात कोठेही नोकरी करते, नवीन जागा, तेथील सामाजिक, भौगोलिक वातावरणाशी जुळवून घेते. घरी कर्तव्य म्हणून नियमित पैसेही पाठवतात. आपल्या आईवडिलांना फॉरेन ट्रीप घडवून देण्याची हौसही भागवतात. परदेशस्थ नातवंडांकडून कळतं की, त्या त्या देशातल्या ‘महाराष्ट्र मंडळात’ ते आपले सर्व भारतीय सण साजरे करतात. आमच्या पतवंडांना कौतुकाने नटवतात व इंग्रजीतून सर्व सणांची माहिती देतात. त्यांच्या कर्तृत्वाने पिढी देश, धर्म, नातेवाइक कशातही अडकून पडलेली नाही. खूप प्रॅक्टिकल आहे.

आमच्या पिढीला पोथ्या, पुराणं वाचूनही जो ‘गीतायोग’, जी अलिप्तता जमली नाही, इतरांकडून अपेक्षा ठेवायची नाही ही समजून निरपेक्ष जाणीव या पिढीला मुळातच मिळाली आहे. धकाधकीचं जीवन, पैसा सर्व गोष्टी पैशावाचून अडताहेत. या सर्वाचा ताण येतो आहे. खरंच आजच्या आमच्या सर्व पतवंडांना व नातवंडांना फार मोठय़ा अग्निपरीक्षेलाच सामोरं जावं लागतंय. आजी, आजोबा म्हणून आम्हाला त्यांची सतत काळजी लागून राहते. म्हणून वाटतं परमेश्वराने आम्हाला दिलं तसं ताणरहित, सहजसोपं जीवन या मुलांच्याही वाटय़ाला येऊ दे, त्यांनाही जीवनाचा निखळ आनंद भरभरून अनुभवता येऊ दे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Atishay wastawadi chitran lihil ahe tumhi. Mi ani mazyasarkhya anekjan ase anubhav satat mulansamor sangat asato. Asha margadardanachi garaj matra sarvanach ahe. Kalat; pan paristiti ekdam nahi badalnar Madhalya pidhine kelyalya chuka jastch gadad ahet tyala durust karayala vel lagel. Ek changla vichar mandala ahe tumhi, lekh wachun nishchitch jababdarichi janiv hote.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट