लोकलमधील गर्दी कमी करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एक नवा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मुंबई- मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलमधील गर्दीमुळे अनेक वेळा प्रवास जीवघेणा होतो. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी येताना प्रचंड गर्दीमुळे सर्व सामान्य मुंबईकरांचे हाल होतात. लोकलमधील ही गर्दी कमी करण्यासाठी आजवर अनेक उपाय योजना करण्यात आला. मात्र त्याचा गर्दी कमी होण्यावर कोणताच परिणाम झाला नाही. आता लोकलमधील गर्दी कमी करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एक नवा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
लोकल गाड्यांमध्ये होणारी सकाळी आणि संध्याकाळी गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयांचे वेळापत्रक बदलता येणे शक्य आहे का या शक्यतेचा विचार करावा असा सल्ला प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. जर काही कार्यालयांच्या वेळेमध्ये बदल केला तर लोकल मधील गर्दी आपोआप कमी होईल अस प्रभु यांचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्र्यांच्या या विनंतीवर विचार करु असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
नव वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात दगडफेक आणि जाळपोल केली होती. या पार्श्वभूमीवर प्रभू आणि फडणवीस यांची भेट झाली.
केवळ सरकारी कार्यालयीन वेळामध्ये बदल न करता खासगी कार्यालयांमधील वेळामध्ये बदल करावा असे मत रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केले.
मुंबईसाठी दोन एलिव्हेटेड मार्गाचा प्रस्ताव ठेवल्याचे प्रभु यांनी सांगितले. यातील पहिला मार्ग सीएसटी ते पनवेल असा असेल तर दुसरा मार्ग चर्चगेट ते विरार असा असणार आहे.
रात्री ९ ते पहाटे ५ ची वेळ छान आहे
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेशप्रभू यांच्याजवळ नालासोपारा येथे राहत असलेल्या रेल्वे प्रवाशांची तक्रार आहे.नालासोपारा येथील रेल्वे प्रवाशिना चर्चगेट येथे कामाकरिता जाण्यास निघायचे असते. नालासोपारा या स्थानकावरुन जर लोकल पकडायची म्हटली तर ती नालासोपाराहून विरारकडे उलट प्रवास करणारे प्रवाशी जाम करतात. आम्ही ही तसाच प्रवास करण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु काही प्रवाशी आपला स्वतंत्र ग्रूप करून नालासोपाराहून विरारकरिता जाणार्या गाड्या पकडतात. प्रत्येक एक प्रवाशी विरार येथील मित्राकरिता पूर्ण तीन जणांच्या सीट अडवतात. जरी त्या तीन सीट खाली असल्या तरी नालासोपाराहून प्रवास करणार्या प्रवाशास ते बसू देत नाही. जवळपास जेथे 62 प्रवासी बसू शकतात, त्या जागा कमाल नालासोपारा येथील 24 प्रवाशी अडवून ठेवतात. जरी उर्वरित 36 ते38 जणास बसायच्या जागा ते प्रवाशी अडवून ठेवतात व एखाद्याने बसण्यास विचारले तर “Reservation” आहे असे हमरितुमरिचे उत्तर देतात, अशावेळेस रेल्वे पोलिस काय मदत करतील?