जैतापूर माडबन अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांना ख-या अर्थाने न्याय मिळवून दिला असेल तर तो उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मिळवून दिला आहे. केवळ त्यांच्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनींचा जास्तीत-जास्त मोबदला मिळाला आहे.
राजापूर – जैतापूर माडबन अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांना ख-या अर्थाने न्याय मिळवून दिला असेल तर तो उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मिळवून दिला आहे. केवळ त्यांच्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनींचा जास्तीत-जास्त मोबदला मिळाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जनहित सेवा समिती काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून मतदान करणार असल्याचे माडबनचे उपसरपंच आणि जनहित समितीचे सदस्य नंदकुमार राऊत यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजणा-या शिवसेनेकडून जनहित सेवा समितीबाबत आणि एकूणच प्रकल्पाबाबत अपप्रचार केला जात आहे. प्रकल्पग्रस्त बांधवांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.
माडबन अणुउर्जा प्रकल्पगस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कै. प्रवीण गवाणकर यांच्या नेतृत्वाखाली जनहित समितीने लढा उभा केला. त्यानंतर आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेने या लढय़ात सहभागी होत हे आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणे दूरच पण प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा फायदा स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेने केल्याचा घणाघाती आरोप राऊत यांनी केला आहे.
मात्र, या लढय़ात कै. गवाणकर यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना त्यांच्या जमिनींचा जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. असे असताना काही शिवसेनेचे पुढारी जनहित समिती अस्तित्वात नसल्याचा वल्गना करीत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपण प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपण असल्याचे पूर्वीपासूनच सांगितले होते. मात्र केवळ पोकळ आश्वासन न देता ना. राणे यांनी प्रत्यक्षात कृतीतून प्रकल्पग्रस्तांसाठी काम केले आहे. सरकार आणि कंपनीकडून त्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वाधिक हेक्टरी २२.५० लाख रुपयांचा दर मिळवून दिला. तसेच त्याचे योग्य पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी लक्ष दिले. आज ९५ ते ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी अनुदान स्वीकारल्याचे राऊत यांनी सांगितले. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देताना आत्तापर्यंत ३० ते ३५ जणांना नोकरी मिळाली आहे.
यापुढे प्रकल्पग्रस्त, स्थानिक भागातील बेरोजगार आणि तालुक्यातील तरुणांनाच नोकरी मिळाली पाहिजे, असा आग्रह धरत तसा लेखी करार राणे यांनी कंपनीशी सरकारच्या वतीने केला आहे. शिवसेनेने यापैकी काय केले ते अगोदर जाहिर करावे असे आव्हान देत केवळ जनतेला भडकवून राजकारण करण्याचे काम शिवसेनेने केले अशी टीका राऊत यांनी केली आहे.
या प्रकल्पाबाबत प्रकल्पग्रस्त व परिसरातील पाच किलोमिटर बाधीत क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या मागण्यांचाही सकारात्मक विचार करण्याची ग्वाही राणे यांनी दिली आहे. तर साखरीनाटेसह परिसरातील मच्छीमार बांधवांनाही भविष्यात या प्रकल्पापासून तोटा होणार असेल तर त्यांनाही योग्य मोबदला आणि नुकसान भरपाई देण्यासाठी प्रसंगी आपण पंतप्रधानांपर्यंत जाऊ पण न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही राणे यांनी दिली आहे.
Rane na virodha hota prakalpala nahi he jantela kalnay evadi kokanchi janta bholi nahi.Kokancha vikas Rane karushkhtat 16 Maychya Vijayane Sampurna MAHARASHTRA KALNAR.