भारतानेही ‘गायडेड ग्लाईड बॉम्ब’ निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. हा बॉम्ब सुचनेनुसार स्वत: लक्ष्य भेदू शकतो.
भुवनेश्वर- युद्धामध्ये शत्रूचा खात्मा करण्यासाठी सर्रासपणे बॉम्ब वापरले जातात. हे बॉम्ब आवश्यक ठिकाणी विमानातून फेकले जातात. सध्या संगणकीय युद्ध वाढू लागले आहे. त्यामुळे भारतानेही ‘गायडेड ग्लाईड बॉम्ब’ निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. हा बॉम्ब सुचनेनुसार स्वत: लक्ष्य भेदू शकतो.
शनिवारी बंगालच्या उपसागराच्या ओदिशा किना-यावर १००० किलो वजनाच्या या बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुमारे १०० किमी अंतर भेदू शकेल एवढी त्याची क्षमता आहे. अशी माहिती डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)चे महासंचालक अविनाश चंदर यांनी दिली.
भारतीय नौदलाच्या विमानाने समुद्रात फेकून त्याची चाचणी घेतल्याचे त्यांनी सांगितले. बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेक्स्ट रेंजवर रडार आणि इलेक्ट्रॉनिक ऑप्टिक सिस्टिमने या बॉम्बवर लक्ष ठेवण्यात येत होते.
ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचे अभिनंदन केले. ही चाचणी यशस्वी झाल्याने भारताने गायडेड बॉम्ब बनवण्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवली आहे.
अभिनंदन