नऊपैकी एका व्यक्तीला पिण्याचे सुरक्षित पाणी मिळत नाही आणि जवळपास दर मिनिटाला एक मूल पाण्याशी निगडित आजारांनी जीव गमावते, असे जागतिक आकडेवारीवरून दिसून आले आहे.
मुंबई- नऊपैकी एका व्यक्तीला पिण्याचे सुरक्षित पाणी मिळत नाही आणि जवळपास दर मिनिटाला एक मूल पाण्याशी निगडित आजारांनी जीव गमावते, असे जागतिक आकडेवारीवरून दिसून आले आहे. हीच समस्या लक्षात घेऊन; भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँक व स्वदेश फाऊंडेशनने मिळून ‘येस कम्युनिटी’ या आपल्या उपक्रमांतर्गत रायगड जिह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे. ‘येस कम्युनिटी’ हा सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रम असून, लोकांचे जीवन सुधारण्याकरता हा उपक्रम बांधील आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ‘येस कम्युनिटी’ २०१४ मध्ये ४ लाख ८९ हजार लोकांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाना चांगले आरोग्य मिळावे, याकरता जानेवारी २०१५पासून ‘येस कम्युनिटी’ प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील गावांत राहणा-या ७० हजारहून अधिक लोकांपर्यंत पाणी शुद्धीकरण व्यवस्था पुरवण्याचे काम ‘येस कम्युनिटी’ने आतापर्यंत केले आहे. केवळ आरोग्यविषयक समस्याच नाही तर शिक्षण आणि अन्य जीवनशैलीशी निगडित समस्याही या संस्थेतर्फे सोडवल्या जात आहेत. या संस्थेकडून स्वच्छ, बॅक्टेरियारहीत आणि रसायनविरहीत पाणी पुरवले जाते.
यासाठी घरगुती आणि व्यावसायिक ठिकाणी विजेकरता अवलंबून राहावे लागत नाही. रॉनी आणि स्वदेश फाऊंडेशनच्या झरीना स्क्रूवाला दर पाच वर्षानी १ दशलक्ष ग्रामीण भारतातील लोकांना सक्षम करण्यावर भर देत आहेत. स्वदेश पाच क्षेत्रांत काम करत असून, यात कृषी आणि जीवनशैली, सामाजिक स्थलांतर, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, पाणी आणि सांडपाणी व्यवस्थेचा समावेश आहे. आजपर्यंत स्वदेशने ४ लाख ७१ हजार लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे.
नऊपैकी एका व्यक्तीला पिण्याचे सुरक्षित पाणी मिळत नाही. जवळपास दर मिनिटाला एक मूल पाण्याशी निगडित आजारांनी जीव गमावते. आरोग्य, शिक्षण आणि जीवनशैलीवर विशेष प्रकाश टाकण्यासाठी येस बँकेला स्वदेश फाऊंडेशनसमवेत जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर युती करताना व रायगडमधील १००० कुटुंबांना पाणी शुद्धिकरण पद्धती वितरीत करताना आनंद होत आहे. लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याची बांधिलकी आम्ही पूर्ण केली आहे. – नमिता विकास, वरिष्ठ अध्यक्ष, येस बँक
या युतीविषयी बोलताना स्वदेश फाऊंडेशनच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त झरीना स्कूवाला म्हणाल्या, स्वदेश फाऊंडेशन दर पाच वर्षानी १ दशलक्ष ग्रामीण भारतातील लोकांच्या सक्षमीकरणाकरता प्रयत्न करत आहे. आमच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे दरदिवशी वर्षभर प्रत्येक घरात २०० लिटर पिण्याचे पाणी पुरवणे हे होय. लिव्हिनगार्ड वॉटर फिल्टरसमवेत असलेल्या भागीदारीच्या माध्यमातून पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी समाजाला पुरवण्याकरता येस बँकेसमवेत युती करताना आम्हाला आनंद होत आहे. – झरीना स्क्रूवाला, संस्थापक, स्वदेश फाऊंडेशन
मी जेव्हा रायगड जिल्ह्यात सर्व बँकांचा इन-चार्ज होतो तेव्हा ह्या सर्व बाबीकडे माझे बारकाईने लक्ष असे. त्या काळी मी अशी एकही घटना होवू दिली नव्हती.