सर्वसाधारणपणे लोक आपल्या ६० ते ७० व्या वर्षानंतर आपले मृत्युपत्र लिहिण्याचे ठरवतात तर अनेक लोकांचा मृत्यू हा मृत्युपत्र न लिहिताच होतो. एका सर्वेक्षणानुसार भारतात ८० टक्के लोक मृत्युपत्र न लिहिताच मृत्यू पावतात. ज्याचे खालीलप्रमाणे दुष्परिणाम होतात.
मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी होत नाही. संपत्तीची वाटणी इंडियन सक्सेशन अॅक्ट, हिंदू सक्सेशन अॅक्ट, मुस्लीम पर्सनल लॉ या कायद्यानुसार होते. बराच काळ न्यायालयीन प्रक्रिया चालते. न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करीत सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावे लागते ज्याला सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो. यासाठी सुमारे ८ ते १० टक्के कोर्टाची फी आणि इतर न्यायालयीन खर्चही करावा लागतो.
एखाद्या व्यक्तीने आपले मृत्युपत्र केव्हा करावे? कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, मानसिकदृष्टया आरोग्यवान असलेल्या तसेच ज्यांच्याजवळ संपत्ती आणि जीवन विमा पॉलिसी आहे त्यांनी मुख्यत्वे आपले मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र लिहिले तरी ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्या व्यक्तीचाच अधिकार राहतो. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची संपत्ती त्याच्या उत्तराधिका-याला मिळते. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा मृत्युपत्र बदलू शकते. अशा वेळी कायद्यानुसार त्या व्यक्तीने शेवटचे लिहिलेले मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.
आपल्याजवळ फारशी संपत्ती नाही किंवा जी संपत्ती आहे त्याचे नॉमिनेशन तर दिलेले आहे, अशा भावनेतून अनेक जण मृत्युपत्र बनवित नाहीत. अशा प्रकारे नॉमिनेशन देऊन ते मृत्युपत्राला महत्त्व देत नाहीत. पण नॉमिनीला ही संपत्ती एक ट्रस्टी म्हणून मिळते. नॉमिनेशन दिल्याने मृत्यूनंतर त्याला संपत्तीचा अधिकार मिळत नाही. उलट वारसांनी संपत्ती मागितली तर ती त्यांना सुपूर्द करावी लागते. शेवटी जर तुमची संपत्ती तुमच्या एखाद्या प्रिय माणसाला द्यायची असेल तर फक्त नॉमिनेशन करून काम भागणार नाही; तर त्यासाठी मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे. मृत्युपत्र तयार केल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपली संपत्तीची वाटणी वारसांना देता येते. याखेरीज मृत्युपत्रामुळे वारसांना टॅक्सचे प्लॅनिंगही उत्तम प्रकारे करता येते.
मृत्युपत्र लिहिताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
संपत्तीची यादी : सर्वात प्रथम आपल्या सर्व संपत्तीची एक यादी करा. चल-अचल संपत्तीची माहिती, सर्व विमा पॉलिसी,यांचा समावेश त्यात असावा.
उत्तराधिका-यांची यादी : मृत्युपत्रात तुम्हाला ज्यांना संपत्तीचे वाटप करायचे आहे, अशा व्यक्तींची एक यादी तयार करा.
संपत्तीची निश्चितीकरण : कोणती संपत्ती कोणाला देणार आहात आणि कोणत्या हेतूने देणार आहात हे निश्चित करणे गरजेचे आहे. हे निश्चितीकरण करताना भविष्यातील विचार करणे आवश्यक असते. दबावाखाली येऊन मृत्युपत्र करणे चुकीचे आहे.
उत्तराधिका-यांचे टॅक्स प्लॅनिंग : मृत्युपत्रात तुम्ही ज्या व्यक्तींना आपल्या संपत्तीचे अधिकार देणार आहात त्यांना त्या संपत्तीवर वर्तमानात आणि भविष्यात किती टॅक्स भरावा लागेल याचा अंदाज घेऊन मृत्युपत्र लिहावे लागेल. असे केल्यामुळे भविष्यात तुमची संपत्ती ज्याला मिळेल त्याला कमीत कमी टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही इस्टेट प्लॅनिंगमधील तज्ज्ञ, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर यांची मदत घेऊ शकता.
मृत्युपत्र कशावर लिहावे? : मृत्युपत्र साध्या कागदावरही लिहू शकता; ते स्टॅम्प पेपरवर किंवा कायद्याच्या कागदांवर लिहावे लागते असे नाही.
मृत्युपत्र टाइप करावे? : कायदेशीरदृष्टया मृत्युपत्र हाताने लिहू शकता किंवा ते टाइप करू शकता. परंतु मृत्युपत्र योग्य प्रकारे वाचता यावे वा त्यात फेरफार करता येऊ नये, यासाठी ते टाइप करणे अधिक चांगले ठरते.
स्पष्ट भाषा आणि शब्द : मृत्युपत्र लिहिण्यासाठी कोणतीही कायदेशीर भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. मृत्युपत्रात स्पष्ट भाषा आणि शब्द वापरावेत त्यामुळे कोणताही गोंधळ निर्माण न होता मृत्युपत्र करणा-याचा हेतू स्पष्ट होईल.
संपूर्ण आणि स्पष्ट विवरण : कोणती संपत्ती कोणाला देण्यात यावी आणि कोणत्या स्वरूपात देण्यात यावी, याचे स्पष्ट विवरण मृत्युपत्रात करावे.
निष्पादकाची नियुक्ती : संपत्तीची वाटणी करण्यासाठी निष्पादकाची नियुक्ती करणे आवश्यक नाही; पण जर संपत्ती खूप असेल आणि वादविवादाची स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता असेल तर एखाद्या विश्वासू व्यक्तीला निष्पादक म्हणून नियुक्त करावे.
प्रत्येक पानावर सही आवश्यक : मृत्युपत्रकर्त्यांने मृत्युपत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक आहे.
साक्षीदार : मृत्युपत्रासाठी दोन साक्षीदार आवश्यक असतात. साक्षीदार परिचित व असे असावेत की मृत्युपत्रामुळे त्यांचा कोणताही फायदा होणार नाही.
रजिस्ट्रेशन : मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन किंवा वा नोटरी करण्याची आवश्यकता नाही. परंतु भविष्यात कोणतेही वाद किंवा गोंधळ होऊ नयेत, यासाठी रजिस्ट्रेशन करणे चांगले. रजिस्ट्रेशनचा एक फायदा असतो तो म्हणजे जर तुमचे मृत्युपत्र हरविले तर तुम्हाला त्याची कॉपी मिळू शकते. मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये होते. मृत्युपत्र तुम्ही स्वत:, वकिलामार्फत किंवा सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनरच्या मदतीने करून
घेऊ शकता. परंतु मृत्युपत्र करणे हे महत्त्वाचे आहे.
नमस्कार सर . मी कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ वरील लेख मला माझ्या ब्लोग वर पब्लिश करायचे आहे
परवानगी द्यावी व माझे ब्लोग आपले पेपर ला माहिती द्यावी…
Jar ekhadya vyaktine apli sarv sampatti agodarch gharchyanchya navavar karun thevali asel ani nantar gharchyachya apmanaspad vagnukimule tyane atmhatya keli asel ani mrutyupurvi tyala te mrutyupatra badlata ale nasel tar ti sampatti kunachya have hote.
Mrutyunanter mulancha taba apalya swatachya ecchepramane konakade dyayache zalyas….v dyayache zalyas sasarkadachi property apalya navavar nastana…apalya ecchepramane konakade mullana sopavtana kontya adharavr sopavu shakato….fakt policy vr ekhadi vyakti mullana swikaru shaktat ka?
सर माझ्या आजोबांचे निधन झाले पण त्या आधी माझ्या चालत्याने म्रुत्युपत्र करून ठेवले आहेत मला काय करावे लागेल माझा पण अधिकार आहे का नाही माझे वडील विरलेले आहे मला काय करावे