देशासाठी सीमेवर प्राणाची बाजी लावणा-या जवानांचा भाजपा आमदार प्रशांत परिचारक याने घोर अपमान केला.
मुंबई- देशासाठी सीमेवर प्राणाची बाजी लावणा-या जवानांचा भाजपा आमदार प्रशांत परिचारक याने घोर अपमान केला. ‘‘पंजाबमधील सैनिक वर्षभर सीमेवर लढतात. तिथेच त्यांना मुलगा झाल्याचा फोन येतो आणि त्या आनंदात ते पेढे वाटतात.’’ असे वक्तव्य करून परिचारक यांनी जवानांच्या पत्नींच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडविले आहेत. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जागोजाग परिचारक याच्या प्रतिमांना जोड्याच्या माळा घातल्या जात असून प्रतिमेचे दहन केले जात आहे. इतका संताप व्यक्त केला जात असताना अद्यापही भाजपाने परिचारक यांच्यावर कारवाई केलेली नाही.
सैनिकांच्याबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या भावनाच प्रशांत परिचारक यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या असून याचा बदला महाराष्ट्रातील जनता मंगळवारी होणा-या मतदानाच्या वेळी घेईल, अशा संतप्त भावना संपूर्ण महाराष्ट्रातून व्यक्त होत आहेत.
राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांची रणधुमाळी भरात आलेली असताना भाजपाचे पंढरपूर येथील आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या वीरपत्नींचा अपमान केला आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना परिचारक याच्या तोंडातून घाण बाहेर आली. ते म्हणाले की, ‘‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला आहे. त्या आनंदात तो जवान पेढे वाटतो’’ परिचारक यांच्या तोंडातून भाजपाचीच सैनिकांविषयी असलेली मानसिकता बाहेर पडलेली आहे.
परिचारक यांच्या या वक्तव्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी परिचारक यांच्या प्रतिमेला जोडय़ाच्या माळा घालून त्याची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. तर काही ठिकाणी प्रतिमांचे दहन करण्यात आले.
सोशलमिडियावरून तर परिचारक आणि भाजपाच्या मानसिकतेचे वाभाडे काढले जात आहे. प्रशांत परिचारक याच्या मुखातून भाजपाची देशाचे रक्षण करणा-या सैनिकांविषयी काय मानसिकता आहे ती बाहेर पडली आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे वक्तव्य करणा-या परिचारिक यांची भाजपाने तत्काळ हकालपट्टी करायला हवी होती. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यातूनच भाजपाचीही मानसिकता काय आहे, हे दिसून येते. परिचारक यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या घाणीची दरुगधी सर्वत्र पसरली असून त्याचा बदला आता मंगळवारी होणा-या मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. विकृत मानसिकतेच्या भाजपाचा पराभव केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.
देशद्रोह ही घराण्याची परंपरा
देशद्रोह ही परिचारक घराण्याची परंपरा असल्याची माहितीही सोशल मिडियावरून व्हायरल झाली आहे. प्रशांत परिचारक यांचे पंजोबा रावबहादूर परिचारक यांनी यापूर्वी असाच देशद्रोह केला होता. स्वातंत्र्यांसाठी लढणारे सोलापूरमधील क्रांतीकारक किसनलाल सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बाण हुसेन यांची खबर रावबहादूर परिचारक यांनीच इंग्रज सरकारला दिली होती. त्या मिळालेल्या माहितीवरून इंग्रज सरकारने वरील चारही क्रांतीकारकांना अटक केली आणि फासावर लटकवले. ही खबर दिल्याबद्दल परिचारक यांना इंग्रजांनी मोठी बक्षीस दिली त्याशिवाय रावबहादूर किताबही बहाल केला, अशी माहिती पुढे आली आहे. त्याच परिचारक यांचे रक्त प्रशांत यांच्या शरीरात असल्याने त्यांनी देशातील सैनिकांचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.
खूप निंदनीय बाब आहे