कॅम्पा कोलामध्ये अनधिकृत फ्लॅट असलेल्या रहिवाशांना ३१ मे २०१४ पर्यंत घरे खाली करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
मुंबई- वरळीतील कॅम्पा कोला कंपाउंडमधील अनधिकृत फ्लॅट असलेल्या रहिवाशांना ३१ मे २०१४ पर्यंत घरे खाली करण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण ही मुदत वाढवून देत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच घरे खाली करण्यासाठी सहा आठवड्यात हमीपत्र देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
कॅम्पाकोला कंपाउंडमधील इसा एकता बिल्डिंग, शुभ अपार्टमेंट, बी. वाय. अपार्टमेंट, मिड-टाउन अपार्टमेंट, आर्चिड अपार्टमेंट, पटेल अपार्टमेंट-अ आणि ब अशा सात इमारती असून, या सर्व इमारतींमधील ३५ मजल्यांवरील ९६ फ्लॅट अनधिकृत आहेत. दोन मे २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे अनधिकृत मजले तोडण्यासाठी मुंबई पालिकेने ११ नोव्हेंबरपासून कारवाई हाती घेतली होती. पालिकेच्या कर्मचा-यांनी डंपरने प्रवेशद्वार तोडून जेसीबी व अन्य वाहने आवारात नेली. यावेळी झालेला आक्रोश आणि माध्यमांच्या दबावामुळे सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ३१ मे २०१४ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यानंतर रहिवाशांची पर्यायी व्यवस्था काय केली आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने या रहिवाशांना ३१ मे २०१४ पर्यंत घरे खाली करण्याचे आदेश दिले.
सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१२ मध्ये कॅम्पाकोला कंपाऊंडमधील सात इमारतींमधील ३५ अनधिकृत मजले तोडून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार महापालिकेच्या पथकाने एप्रिल महिन्यांत हे अनधिकृत मजले तोडण्याची नोटीस पाठवून कार्यवाही हाती घेतल्यानंतर रहिवाशांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर दोन मे २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांना तात्पुरता दिलासा देत पाच महिन्यांत हे अनधिकृत मजले तोडण्यात यावे, असे आदेश दिले होते. आता पून्हा एकदा मुदतवाढ देत कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०१४ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
१४० अनधिकृत फ्लॅट्स असलेल्या वरळीतील कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजल्यांवर कारवाई अटळ असून सुप्रीम कोर्टाने येत्या ३१ मे १०१४ पर्यंत सर्व बेकायदा फ्लॅट्स खाली करण्याचे आदेश आज दिले. ३१ मे नंतर अनधिकृत मजले पाडण्याची कारवाई महापालिकेने हाती घ्यावी, असे कोर्टाने आता स्पष्टपणे नमूद केले आहे. या महिन्यात १४ नोव्हेबरला प्रसारमाध्यमांच्या वृत्ताची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘स्यु मोटो’ दाखल करत कॅम्पा कोला पाडण्यास स्थगिती दिली. हा आनंदोत्सव साजरा करताना, ज्या प्रसारमाध्यमांनी त्यांचे दु:ख आणि व्यथा जगासमोर मांडल्या , दिवसभर उपाशी- तापाशी राहून मिडियाच्या प्रतिनिधींनी कॅम्पा कोला वासीयांची बाजू लावून धरली होती, त्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ‘आता तुम्ही इथून जा’ असे सांगत चक्क घरचा रस्ता दाखवला. या वागण्याचा अत्यंत वाईट अनुभव प्रसारमाध्यमांना आला. आता बघा मिडिया कॅम्पा कोला ची कशी वरात काढतेय … ‘ मोका सभीको मिलता हे दोस्त ‘
– अमोल देशपांडे