मनसेच्या कार्यकर्त्यांनी २००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेच्या दिवशी परप्रांतियांना केलेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे बुधवारी वांद्रे न्यायालयात हजर झाले.
मुंबई- रेल्वे भरती मंडळाच्या ऑक्टोबर २००८ मध्ये झालेल्या परीक्षेवेळी चेतना महाविद्यालयात हिंसाचार केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध जारी केलेले वॉरंट वांद्रय़ाच्या महानगर दंडाधिका-यांनी बुधवारी रद्द केले.
या प्रकरणी सुनावणी सुरू असताना न्यायालयाला गरज भासेल त्यावेळी दंडाधिका-यांसमोर हजर राहण्याचे आश्वासन राज यांनी या वेळी दिले. मात्र परीक्षा सुरू असताना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी आपण तेथे उपस्थित नसल्याने या खटल्यातून आपले नाव वगळावे, अशी विनंती राज यांनी केली. याबाबतचा अर्ज (डिस्चार्ज अॅप्लिकेशन) सादर करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी रा. ना. आंबटकर यांनी राजचे वकील सयाजी नांगरे यांना दिले. १ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असून, त्यावेळी सरकारी वकील यावर म्हणणे मांडतील.
या प्रकरणाची सुनावणी १० जून रोजी दंडाधिका-यांसमोर झाली असताना, राज ठाकरे उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी ११.२० वाजता राज ठाकरे दंडाधिका-यांसमोर हजर झाले. त्यावेळी वॉरंट रद्द करण्याची मागणी अॅड. नांगरे यांनी केली. हा त्यांचा युक्तीवाद दंडाधिकारी आंबटकर यांनी मान्य करून वॉरंट रद्द केले. त्यानंतर राज तेथून लगेचच बाहेर पडले.
दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी राज ठाकरे तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे या गुन्ह्यातून नाव वगळण्याची विनंती अॅड. नांगरे यांनी केली. याबाबत डिस्चार्ज अर्ज सादर करण्यात येईल, असे अॅड. नांगरे यांनी सांगितले. यावर सरकारी वकिलांनी १ जुलैपर्यंत म्हणणे मांडावे, असे निर्देश दंडाधिका-यांनी दिले.
या प्रकरणी राजसह मनसेच्या २० कार्यकर्त्यांवर पोलिसांनी विविध कलमांतंर्गत गुन्हे दाखल केले आहेत. नोव्हेंबर २००९ मध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले आहे.
So the great Raj finally has begged for cancellation of the warrant against him. Why did he then make a show of supporting the “Marathi Manoos”? This action on his part clearly shows that he has no guts to stand up to actions against him and with this action, he has thrown his loyalists to the dogs. MNSevaks, Shanaane Vaa Aattaach.