मुंबईतून गेल्या वर्षभरात एक हजार ६३७ कोटी रुपयांची मालमत्तेची चोरी झाली असल्याची बाब राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या (एनसीआरबी) २०१३ ची आकडेवारीतून समोर आली आहे.
मुंबई- मुंबईतून गेल्या वर्षभरात एक हजार ६३७ कोटी रुपयांची मालमत्तेची चोरी झाली असल्याची बाब राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या (एनसीआरबी) २०१३ ची आकडेवारीतून समोर आली आहे. संपूर्ण राज्यातून चोरीला गेलेल्या मालमत्तेच्या तुलनेत हा आकडा सुमारे ३८ टक्के आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे चोरी गेलेल्या मालमत्तेतील केवळ ४.३ टक्के मालमत्ताच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
प्रहार कौल-
[poll id=”705″]
२०१३ मध्ये मुंबईत घरांमध्ये १० दरोडे टाकण्यात आले. त्यात १६ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. महामार्गावरील दरोडय़ांच्या तीन घटनांमध्ये १६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याशिवाय व्यावसायिक कार्यालयात झालेल्या सात लुटीच्या प्रकरणांमध्ये ५१ लाख अशा एकूण ४१ दरोडय़ांच्या घटनांमध्ये ९ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. याशिवाय घर, कार्यालये, इतर ठिकाणांवर झालेल्या २७५७ जबरी चोरींच्या गुन्ह्यांमध्ये २३ कोटी ३१ लाख रुपये लुटण्यात आले आहेत. याशिवाय २९३६ घरफोडय़ांमध्ये ५५ कोटी ५३ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच १० हजार ५६१ चो-यांमध्ये १७ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे.
वर्षभरात राज्यात ४,३१५ कोटींवर चोरट्यांचा डल्ला
संपूर्ण राज्याचा विचार केला, तर २०१३मध्ये राज्यातून ४ हजार ३१५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला होती. त्या तुलनेत ३१९ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अवघा ७.४ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईतून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यातील इतर शहरांशी तुलना केल्यास यात मुंबई पोलिस खूपच मागे पडल्याचे दिसून येते.
राज्यातील इतर शहरांपैकी पुणे शहरातून २०१३मध्ये २३७ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. त्यातील ५.८ टक्के म्हणजेच १३ कोटी रुपयांची मालमत्ता परत मिळवण्यात आली. नाशिकमध्येही चोरीला गेलेल्या ३४ कोटींच्या ऐवजापैकी दोन कोटी म्हणजे ६.५ टक्के ऐवज, तर औरंगाबादमध्ये ४४ कोटींपैकी दोन कोटी म्हणजे ५.२ टक्के ऐवज हस्तगत करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले.
एकट्या मुंबईचा विचार करता २०१३ मध्ये मुंबईत १० घरांवर दरोडे टाकण्यात आले असून, त्यात १६ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. महामार्गावरील दरोडय़ांच्या तीन घटनांमध्ये १६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याशिवाय व्यावसायिक कार्यालयांत झालेल्या लुटीच्या सात प्रकरणांमध्ये ५१ लाख अशा दरोडय़ाच्या एकूण ४१ घटनांमध्ये ९ कोटी ३० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याशिवाय घर, कार्यालये, इतर ठिकाणांवर झालेल्या २७५७ जबरी चोरींच्या गुन्ह्यांमध्ये २३ कोटी ३१ लाख रुपये लुटण्यात आले आहेत. तसेच २९३६ घरफोडय़ांमध्ये ५५ कोटी ५३ लाख रुपयांचे ऐवज चोरीला गेला आहे. १० हजार ५६१ चो-यांमध्ये १७ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. मुंबईतून चोरीला जाणा-या गाडय़ांची संख्याही मोठी आहे. मुंबईतून २०१३मध्ये ३७८९ गाडय़ांची चोरी झाली. त्यात दुचाकी, बस, कार यांचा समावेश आहे.
मुंबैकारानू बिनधास्त झोपून रहा !!