गणेशोत्सवासाठी गावी जाणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी युवा नेते नितेश राणे अध्यक्ष असलेल्या ‘स्वाभिमान’च्या वतीने शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या बसच्या बुकिंगसाठी संघटनेच्या मुख्यालयात मोठी गर्दी उसळली.
मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी युवा नेते नितेश राणे अध्यक्ष असलेल्या ‘स्वाभिमान’च्या वतीने शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या बसच्या बुकिंगसाठी संघटनेच्या मुख्यालयात मोठी गर्दी उसळली. ही तिकिटे मिळवण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावण्यास सुरुवातकेली. परंतु संध्याकाळपर्यंत तिकिटांसाठी चाकरमान्यांच्या रांगा वाढतच जात होत्या. दिवसभरात दीड हजारांहून अधिक कोकणातील जनतेने तिकिटांची नोंदणी केली. मंगळवारीही सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत तिकीट विक्री होणार आहे.
गणपतीत गावाला जाणा-या कोकणातील जनतेची होणारी लूटमार लक्षात घेता नितेश राणे यांनी देवगड, मालवण, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यातील जनतेसाठी शंभर रुपयांमध्ये खासगी बस सेवा देण्याचे जाहीर केले. यासाठी २४,२५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी आठ बसेस तर २७ व २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसेस सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी २१ जुलैपासून वांद्रे पश्चिम येथील शॉपर्स स्टॉप, मुव्ही टाइम सबर्बिया सिनेमाजवळील डेक्कन कोर्टमधील ‘स्वाभिमान’च्या मुख्यालयात तिकीट नोंदणी आणि विक्रीला सुरुवात झाली.
अवघ्या १०० रुपयांमध्ये परतीच्या प्रवासासह बसचे तिकीट मिळवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने वांद्रय़ातील ‘स्वाभिमान’च्या कार्यालयावर पहाटे पाच वाजल्यापासून गर्दी करायला सुरुवात केली होती. भांडुपमध्ये राहणारे कणकवलीमधील अक्षय मधुसूदन दळवी, कुल्र्यात राहणारे आच-यातील समीर अवधूत नागवेकर आणि चारकोपमध्ये राहणारे कुडाळमधील रोहन सकपाळ हे पहाटे पाच वाजल्यापासून रांगेत उभे होते. सकाळी अकरा वाजता तिकीट नोंदणी व विक्रीला सुरुवात झाली. परंतु त्यावेळी शॉपर्स स्टॉपजवळून लिंकिंग रोडवर तिकिटासाठी रांग पुढे सरकत होती. प्रत्येक पाच-पाच जणांना एकत्र घेत तिकिटे देण्याचे काम मुख्यालयातील कर्मचारी आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते व पदाधिकारी जलदगतीने आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत होते. तरीही तिकिटाची रांग वाढतच होती. मात्र कोकणातील जनताही स्वाभिमानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही सहकार्य करत होते.
कोकणातील जनता ही आपल्या कुटुंबातीलच सदस्य असल्याची भावना कायम राणे कुटुंबीयांनी बाळगली आहे. त्यामुळेच तिकीट मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या जनतेला त्रास होऊ नये याची काळजी ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात होती. पाणी, बिस्किटांचे वाटप रांगेतील लोकांना केले जात होते. कोकणातील जनतेची काळजी हे केवळ राणे कुटुंबियच घेऊ शकतात, ते आम्हाला चांगल्या आणि सवलतीच्या सुविधा देऊ शकतात, अशी भावना रांगांमध्ये उभ्या असलेल्या लोकांकडून व्यक्त होताना दिसत होती. दुपारी चार वाजता ही रांग अधिकच वाढत जात होती. अखेर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत तिकीट विक्री सुरू ठेवली होती. दिवसभरात १८०० जणांनी नोंदणी करून तिकीट खरेदी केल्याची माहिती स्वाभिमानच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
सुंदर उपक्रम
nitesh you are great