‘राज्यराणी’ ही दादर ते सावंतवाडी जाणारी एक्सप्रेस रात्री ११.५५ ऐवजी पहाटे २.३० वाजता सुटल्याची माहिती ‘राज्यराणी’ने प्रवास करणा-या प्रवाशांनी दिली.
मुंबई – ‘राज्यराणी’ ही दादर ते सावंतवाडी जाणारी एक्सप्रेस रात्री ११.५५ ऐवजी पहाटे २.३० वाजता सुटल्याची माहिती ‘राज्यराणी’ने प्रवास करणा-या प्रवाशांनी दिली. मात्र या संदर्भात ‘मध्य’ रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांकडे अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने पुन्हा एकदा रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
ही गाडी नेहमीप्रमाणे १०.१५ वाजता फलाटावर आली आणि पहाटे २ वाजून ३० वाजता सुटली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने विलंब होत असल्याचे कारण रेल्वे कर्मचा-यांकडून देण्यात आले. त्यानंतर इंजिनात बिघाड झाल्याचे कारण दिले.
याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांना विचारले असता असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे ( राजकारण ) राज्य राणीत तर घुसले नाही ना ???