राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी वर्तवलेली ही तिसरी शक्यता आहे. या आधी त्यांनी अशी शक्यता केवळ वर्तवलीच होती, असे नाही तर ती गृहित धरून पक्षाच्या कार्यकर्त्यांना तयारसुद्धा राहायला सांगितले होते. एवढेच नव्हे तर कोणकोणते मतदारसंघ आपल्याला जिंकता येतील, याचा विचार करून त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करायलासुद्धा सुरुवात केली होती. पवारांची गेल्या दोन वर्षातील मुदतपूर्व निवडणुकीची भाकिते ही ‘लांडगा आला रे, आला’च्या शैलीची आवई ठरली होती. त्यामुळे आतासुद्धा ती तशीच ठरण्याची शक्यता अधिक आहे. मुदतपूर्व निवडणुकीच्या आपल्या भाकिताची मीमांसा करताना पवारांनी जे कारण सांगितले आहे, ते खरे वाटत नाही. तेलंगणाच्या निर्मितीवरून आंध्र प्रदेशामध्ये जे आंदोलन निर्माण झाले आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील, असे त्यांना वाटते. आंध्र प्रदेशातील विशेषत: सीमांध्र भागातील परिस्थिती गंभीर आहे, हे कोणी नाकारत नाही. तिथे परस्परविरोधी मागण्यांनी अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे की, तिच्यातून खरोखर काय निर्माण होणार आहे, याचे आकलन होत नाही. तेलंगण निर्मिती केली नसती तर तेलंगण भागात अशीच स्थिती निर्माण झाली असती. पण तेलंगण निर्माण केल्यावरही सीमांध्र भागात त्यापेक्षा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत फार तर आंध्र प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. पण या परिस्थितीचे परिणाम आंध्राच्या बाहेर जाणवण्याची शक्यता नाही. अनुभवसुद्धा तसा नाही. तेव्हा या गंभीर स्थितीचे जे काही परिणाम होणार आहेत ते आंध्र प्रदेशापुरते मर्यादित राहणार आहेत. तिच्यावरून लोकसभा बरखास्त करून पूर्ण देशातच मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील, असे संभवत नाही. आजपर्यंत असे कधी झालेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये १९८२ ते १९९१ असा दशकभर हिंसाचाराचा तांडव सुरू होता. ती परिस्थिती तर आजच्या सीमांध्रातील परिस्थितीपेक्षा अधिक गंभीर होती. परंतु त्या काळातसुद्धा कधीही पूर्ण देशभरात लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेतल्या गेल्या, असे घडले नाही. असे आहे तर मग आंध्र प्रदेशातील स्थितीवरूनच मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता पवारांना का दिसत आहे, हे काही कळत नाही किंवा असे तकलादू कारण सांगून मुदतपूर्व निवडणुकीची आवई उठवण्यामागे पवारांचा दुसराच काही तरी इरादा असण्याची शक्यता आहे. शेवटी पवार हे एका दगडात अनेक पक्षी मारण्यात कसे वाकबगार आहेत, हे सा-यांना माहीत आहे. जे असल्याचे ते भासवतात ते तसे नसतेच, असे अनेक वेळा अनुभवाला आलेले आहे. सध्या शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्यात महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा वाटपावरून गंभीर स्वरूपाचा वाद जारी आहे. त्या वादाचा संदर्भ या आवईला असू शकतो. अर्थात तो कसा असण्याची शक्यता आहे, याचे विश्लेषण फार तपशीलाने करावे लागेल. मात्र, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आणि त्या निवडणुकीत निर्माण झालेले वेगवेगळ्या प्रकारचे तिढे यांचाही संदर्भ पवारांच्या या भाकिताला असू शकतो.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
saheb is great .