अमरनाथ यात्रेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीनगर- अमरनाथ यात्रेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरुंच्या बसवर सोमवारी रात्री अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी आहेत.
यात्रेकरूंची ही बस सोनमर्गहून आली होती. अनंतनाग जिल्ह्यातून ही बस रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निघाली होती. या बसची अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे नोंद नव्हती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते.
रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २० मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. मृतामध्ये सहा महिलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस महनिरीक्षक मुनीर खान यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला.
अमरनाथ यात्रेत झालेला दहशतवादी हलला हा काही हिंदू धर्मियांवर केलेला हल्ला नाही , त्यामुळे त्याला कोणीही धार्मिक रूप देऊ नये .
हज यात्रेकरूंना सुद्धा यातून सूट नाही आहे .
१०० कोटी हिंदू मधले फक्त ७ लोक तर मेलेले आहे , खूप काही नुकसान नाही झाले.
आणि हो मिळालेत अवॊर्डस , पुरस्कार परत दयायची काही गरज नाही,कारण हिंदू मेलेत मुस्लिम किंवा क्रिशचन नाही.
अमीर खान, शारुख खान ह्यांनी देश सोडायची काहीहि गरज नाही.
त्यामुळे सर्वे काँग्रेस, कम्युनिस्ट , मानवतावादी लोकांनी निदर्शने, आंदोलन , मोर्चे काढून ह्या हल्याचा विरोध करू नये.
असे केल्यास तुम्ही मुस्लिम विरोधी व हिंदुत्ववादी आहात असा समज होईल व ते मानवतेला धरून होणार नाही.
जर कोणी तसे केले तर पुढच्या वर्षी इफ्तार पार्टी ची दावत सुद्धा मिळणार नाही.
आणि हज हाऊस साठी निधी साहेबांकडे जमा करा लवकरात लवकर ………
“काही हिंदू भाविक तर मेलेले त्यात काय मोठे “