बिहारमधील महाबोधी मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नवी दिल्ली – बिहारमधील महाबोधी मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. धार्मिक स्थळावर असे दहशतवादी हल्ले कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
आमच्या संस्कृती आणि परंपरेने आम्हाला सर्व धर्मांचा आदर करायला शिकवले आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर असे दहशतवादी हल्ले अजिबात खपवून घेणार नाही असे पंतप्रधानांनी सांगितले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
बोधगया येथील महाबोधी मंदिरात रविवारी पहाटेच्या सुमारास एकापाठोपाठ एक नऊ बॉम्बस्फोट झाले. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्याला जबाबदार असणा-यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
भारताचे सध्याचे पंतप्रधान हे फक्त निषेधच करू शकतात बाकी त्यांना काही उपाय योजना दिसत नाही. धन्य तो भारत देश .