हा पराभव मी स्वीकारला असून ज्या कोकणी माणसाने यापूर्वी भरभरून मते दिली. अनेक उच्चपदेही त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनीच आज पराभूत केल्यावर त्यांच्यावर मी नाराज वा दु:खी नाही.
हा पराभव मी स्वीकारला असून ज्या कोकणी माणसाने या पूर्वी भरभरून मते दिली. अनेक उच्चपदेही त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनीच आज पराभूत केल्यावर त्यांच्यावर मी नाराज वा दु:खी नाही. एक खंत जरूर वाटते. माझ्या पराभवामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळ शमले. त्याचबरोबर कोकणासाठी, राज्यातील दीनदुबळ्यांसाठी हक्काचा माणूस कोण असेल हे प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेले असेल. माझ्या पराभवानंतर अनेक कार्यकर्ते, स्त्री-पुरुष रडले, त्यांनी ढसाढसा अश्रू ढाळले, हे सगळे पाहून मी भारावलो व त्यातून सावरणे कठीण गेले. माझ्या पराभवाने श्री. नितेश राणे यांचा भव्य विजय २५ हजार ९७९ मतांनी झाला आहे, तो झाकला गेला. माझ्या पराभवाचे पडसाद नितेशच्या विजयावर झाले. ढोलताशे वाजू शकले नाहीत. याची मात्र खंत वाटली. जसा माझा पराभव मोठा तसा नितेशचा विजय देखील मोठाच म्हणावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होऊनही नितेश निवडून येतो; हे ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व मतदारांनी मतदान केले त्यामुळे हा विजय होऊ शकला. नितेशचे अभिनंदन!
‘नितेश, लक्षात ठेव हा नियतीचा खेळ आहे. सूर्य व चंद्र एकाचवेळी उगवत नाहीत. एक उगवतो, तर दुसरा मावळतो’! तेव्हा राजकारणातील राणे कुटुंबाचे अस्तित्व आणि कोकणवरचा राणे कुटुंबाचा ठसा कायम ठेव. या पराभवातून बरेच काही मला शिकता आले. असा पराभव होईल, असे मला वाटले नव्हते. दिवसरात्र मेहनत, परिश्रम करून सिंधुदुर्ग व कोकणचा विकास हा माझा ध्यास होता. विकासकार्य व सेवा प्रामाणिकपणे करूनही पराभव होतो. यावर माझा विश्वासच बसत नाही. सिंधुदुर्गसाठी काय कमी केले हे समजूच शकत नाही. सर्वच क्षेत्रांत भरीव काम केले आहे. यामुळेच सिंधुदुर्गातील मानवी निर्देशांकात वरच्या स्थानावरती एक गरीब जिल्हा प्रगतशील जिल्हय़ांशी स्पर्धा करू लागला. काँग्रेस पक्षाचा प्रचारप्रमुख म्हणून राज्यभर प्रचार करत असताना काँग्रेसचे अनेक नेते ‘राणेसाहेब तुम्ही आमच्या मतदारसंघात प्रचाराला या’ असे सांगत होते. व त्याप्रमाणे मी देखील राज्यातील अनेक मतदारसंघांत प्रचाराला गेलो. माझ्या मतदारांवर व माझ्या चाहत्या कार्यकर्त्यांचा मला केवढा विश्वास, पण विश्वास सार्थकी ठरला नाही, असो.
१९९० साली कोकणात आलो. माझा जन्म याच जिल्हय़ातील. २५ वर्षापूर्वी मी आमदार झालो. येथील लोकांनी, कार्यकर्त्यांनी खूप प्रेम दिले, विश्वास टाकला. मी भारावून गेलो. असे वाटले की माझे संपूर्ण आयुष्य जरी कोकणसाठी झिजवले तरीही कोकणी माणसाचे उपकार मी फेडू शकणार नाही. ही उपकाराची परतफेड करत असतानाच माझी वाट बंद केली गेली, माझा कोणताही दोष नसताना! यात माझी तक्रार नाही. ना कार्यकर्त्यांबद्दल किंवा विरोधकांबद्दल आणि मतदार यांच्याबद्दलही. मी त्यांचे ऋणच व्यक्त करीन. होणारा विरोध आणि मिळणारे सहकार्य यातूनच प्रेरणा मिळाली. राज्याच्या राजकारणात शिखर गाठलं. आज मात्र ख-या अर्थाने मोकळा झाल्यासारखा भास होतो. विरोधक, टीकाकार यांना हायसे वाटले असेल. तसे कमी-अधिक प्रमाणात सर्वच जणांना वाटत असेल. मी, आज आत्तापर्यंत तुमच्याबरोबरच होतो. तुम्ही माझ्याशी ज्या प्रकारे वागलात त्याबद्दल ईश्वर तुमचे कल्याण करो, असे उद्गार काढेन. चला, पाहूया नवीन दमाची नवीन टीम या कोकणचे, महाराष्ट्राचे चित्र कसे बदलते ते!
महाराष्ट्राचे विधिमंडळ माझी आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. मी विधिमंडळात एक इतिहास निर्माण केला. त्यातूनही मार्गदर्शन मिळेल, असे वाटते. परत एकदा या जिल्हय़ातील सर्व मतदार, नागरिक या सर्वांचे आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. जनतेला आणि सर्वांनाच उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, ही रामेश्वरचरणी प्रार्थना करतो.
[EPSB]
महाराष्ट्राच्या राजकारणातील माझी उणीव युवा आमदार नितेश राणे भरून काढतील
‘‘कोकणी माणसाने मला राजकीय जीवनात बरेच काही दिले. त्याच जनतेने पहिला पराभवही दाखवला. हा पराभव मी मान्य केला आहे. मतदारांचा कौल मी मान्य करतो. माझी कोणतीही तक्रार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात माझी उणीव युवा आमदार नितेश राणे भरून काढतील. कोकणी माणसाचा ठसा उमटवतील,’’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कणकवली येथे व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासाच्या मॉडेलचा, कोकणाच्या परिवर्तनाच्या विचाराचा ऊहापोह हे या लेखाचे प्रयोजन आहे.
[/EPSB]
राणे साहेब तुम्हीच या कोकणचे भाग्यविधते आहात…. कोकणी मानस का विसर्ली की ज्या सिंधुदुर्गाला कोणी ओळखत नव्हत त्या सिंधुदुर्गाला एक शिवाजी महाराजांच्या एका कोकणी मावल्याने ओळख करून दिली त्या माणसालाच लोक कशी विसरू शकली….तुमची कोकनाबाद्ल्ची तळमळ नाही कोकणी मानस कधीच जणू शकली नाही ……..याच दुख वाटत ………पीएन एमएलए खात्री आहे की नारायण राणे नावच हे वादळ पुन्हा निर्माण होईल ….आणि आपला लढा हा कोकणच्या विकाससाठी आहे हे लोकांना दाखवून देईल…साहेब तुमचं पराभव होईल ही गोष्टच पटत नाही मनाला…डोळ्यात पाणी उभ राहत…
राणेसाहेब, मी खरे तर भाजप चा मतदार .पण मला आपल्या पराभवाचेदुःख आहे. मी गुहागरचा.शिक्षणासाठी सावंतवाडीला होतो ..आपण केलेला विकास ,महामार्गाचे बांधकाम .आपली कोकणी माणसाची प्रेमाची भावना .सगळं अगदी स्पष्ट .मग असे का झाले ?फारच वाईट वाटलं .मी व्यक्ती केंद्रित नसूनही मला आपल्या विषयी आदरच आहे.
राणे साहेब,
तुम्ही एक तलवारी प्रमाणे आहे ती सदव्य तळपत राहणार.
आज ना उद्या कुडलातील जनतेला हे समजेल त्यांचा किती विकास होणार ते…
साहेब खरं तर मी मुंबईकर पण माझ गाव कुडाळ.. मला ह्याची जास्त खंत आहे.
लाज वाटली पाहिजे ह्या कुदाल्काराना…ज्या राणे साहेबांनी कोकणासाठी जे काही केल आहे ते सांगायची गरज नाही ते आख्या महाराष्ट्राला माहीत आहे.
कुडाळकर कदीच कोणाचे होऊ शकत नाही.
साहेब तुम्ही आशावादी आहे आणि आम्ही देखील…..
आता भिकेला लागा कुदाल्कारानो…..
खरच आज लाज वाटते मला कुडाळ & मालवण तालुक्यातील जनेतेची दिवस रात्र कोकणासाठी झटून ज्या माणसाने कोकणाला एका उच्च शिखरावर नेउन ठेवलं त्या दादांना आज जनता नाकारते खरच विश्वास बसत नाहीय. कोकणातल्या जनतेने एवडा विचार करावा कि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून किती भरभराटीला आला.
साहेब , तुम्ही आमचे आहात आणि आमचे रहाणार ……
राणे साहेब खूप दुख वाटले तुमचा पराभव म्हणजे एक कणखर नेतृवाचा पराभव मला नाही वाटत आपल्या सारख कणखर व धाडसी नेतृत्व विधानसभेला लाभेल . साहेब तुमचा एक फ्यान नाशिक {{kalwan}
राणे साहेब, आज मला खूब दुख्ख झाले आहे, तुम्हाला आम्ही आक्रमक नेता आणि कोकणचा भाग्यविधाता म्हणून बघतो, आज आम्हाला तुमची गरज आहे, ह्या मालवणी आणि कुडाळच्या माणसांना नक्कीच काही दिवसात समजेल आणि तुमची त्याना उणीव भासेल हे १०० टक्के खरे आहे, ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासि गद्दारी केली ते सुखी राहू शकत नाहीत, तुम्ही परत पूर्वीच्या फार्म मध्ये याल हे नक्कीच., तुमच्या सारखा नेता ह्या कोकणाला मिळूच शकत नाही., मला नितेश साहेब आमच्या कणकवली मतदार संघातून आले त्या बधल मी माझ्या कणकवली मतदारांचे आभारी आहे, , आणि नितेश साहेबांना हार्दिक सुभेच्छा ! , कुडाळ आणि मालवणी माणसांची लाज वाटते …………संतोष राणे, मुंबई
या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी मंत्री मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि ज्याचं कसल्या हि एका पैशाच्या गैरव्यवहारात नाव नाही त्या कोकणच्या सुपुत्राला मात्र पराभवाची चव चाखावी लागली. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीत तीन माजी मुख्यमंत्र्यांची नाव भ्रष्टाचारी म्हणून घेतली पण राणे साहेबांच नाव घेतल नाही का ? यातच सर्व काही आल. तरी सुद्धा मालवणी जनता विरोधकांच्या आरोपांना बळी पडली. राणे घराण्याची चुकी हीच कि त्यांनी नेहमीं कोकणच्या विकासासाठी झगडा केला व काही ठिकाणी विकासाच्या आड येणाऱ्या विरोधकांना वडिलकीच्या नात्याने दरडावल. मालवणी माणसाच दुर्भाग्य. जो माणूस मालवणी माणसासाठी च इतके वर्ष झगडत राहिला त्या माणसाला मालवणी माणसाने चांगल फळ दिल.
राणे साहेब विधानसभा निवडणुकीत पडले त्याबरोबर भाड्खाऊ जाधवा सारख्या कोल्ह्यान ची कोल्हे कुई सुरु झाली. काहीना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मराठी माणसाने या निवडणुकीत राज्यात इतरत्र सुद्धा स्वताची चांगली अक्कल दाखवली. मराठी माणसां साठी लढणाऱ्या म न से ला हद्दपार केल आणि जातीयवादी ओवेसी च्या पक्षाला जागा दिल्या. महाराष्ट्रा ची शकले पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या. या सर्वाचे परिणाम आता नाहीत तर थोड्या वर्षांनी दिसणार. आताच भाजपने बेळगावच बेळगावी करून त्याची झलक दाखवली आहे.
राणे साहेब कोकणची शान आहेत. थोड्या कोकणी जनतेचे डोळे उघडतील. कारण त्यांच्या शिवाय कोकणचा विकास अशक्य.
तुमच्यासारखा नेता कोकणात होणे नाही ; परंतु राणे साहेब तुमची उणीव नीतेशसाहेब राणे नक्कीच भरून काढतील ….भविष्यात आपण कोकणी जनतेचा ज्या चुकीच्या समजुतीने जो काही गैरसमज झाला तो दूर होईल आणि आपली रानेगर्जना पुन्हा ऐकू येईल तसेच साहेब ज्या कोकणी जनतेचा गैरसमज झाला आहे त्या कोकणी माणसाला तुमच्या कार्यकर्तुत्वाची ओळख पुन्हा पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात निर्माण व्हावी हीच इच्छा मी श्री लिंगेश्वर चरणी व्यक्त करतो …………
माननीय राणे साहेब
आम्ही शिवडीत राहत असून मी आणि माझा भाऊ आणि माझ सर्व कुटुंब हे आपले कट्टर समर्थक आहोत जेव्हा शिवसेना सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आगदी त्या पासून ते आपल्या कुठल्या निर्णय मध्ये सामील झालो, आहे आणि राहणार.
आमचे लाडके माननीय नितेश साहेबांनी स्वाभिमान संघटना स्थापन केली त्यापासून आम्ही दोघे भाऊ त्या संघटनेत कार्यरत आहे, साहेब आम्ही आपल्या सोबत खूप वेळा दौरे केलेत आणि पहिले हि आहे, आपण ज्या प्रमाणे प्रत्येक कार्यकार्तेंचे मनात हात घालतात असा ‘लाडके’ साहेब तुम्हीच आहात. मी पाहिलं आहे कि तुम्ही दिवस रात्र कोकणच्या हितच पाहिलं. साहेब कितीही कोणी काही बोलू दे पण आम्हाला आणि आख्या महाराष्ट्र ला माहित आहे कोकणचा विकासाच दुसर नाव म्हणजे आपण खुद्द राणे साहेब, हीच आपली खरी समाजकारण आणि राजकारणाची पावती आहे. तुमच्या असलेला ‘देव’ मी पाहिलं आहे. “वादळ येउन गेला आहे”, आता पुन्हा आपण सुरवात कराल हे आम्हाला माहित आहे, आणि आमचे नितेश साहेब आहेच….
कोकण पण तेच राहणार, आणि कोकणाचा वाघ तुम्हीच राहणार!
आपला,
सिद्धेश ता.बावकर
राणे साहेबचा पराभव खूपच मनाला चटका लावणारा. कोकणचा विकास राणे कुटुंबियच करू शकतात . कोकणी माणसाने याचा विचार karawa या पुढे अशी चूक होणार नाही याच काळजी gyavi.