सोशल मीडियावर सोमवारी भारत बंदचे आवाहन कुणी केले याची काहीच माहिती नाही आणि देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन झाली.
पुणे- सोशल मीडियावर सोमवारी भारत बंदचे आवाहन कुणी केले याची काहीच माहिती नाही आणि देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन झाली. त्यामुळे सोमवारी झालेल्या हिंसाचाराला सर्वस्वी शासन आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सोशल मीडियावर मागील दहा दिवसांपासून सोमवारच्या भारत बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला आणि देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
देशातील परिस्थिती हळूहळू बेकाबू होत चालली आहे. या देशाला कुणी नेता राहिला नाही. सर्व जातीजातीत विभागले गेले आहे. त्यामुळे या देशाची अवस्था हळूहळू सीरियाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन बोलण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
देश नव्हे ,काही विशिष्ट्य लोक सीरियाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
यांना सामान्य जनतेपेक्षा नक्षलवादी जवळचे वाटतात .