दिल्लीत पुन्हा एकदा गाडयांसाठीचा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. १५ ते ३० एप्रिल दरम्यान सम-विषम योजनेच्या दुसरा टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
नवी दिल्ली- दिल्लीत पुन्हा एकदा गाडयांसाठीचा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. १५ ते ३० एप्रिल दरम्यान सम-विषम योजनेच्या दुसरा टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याची घोषणा केली.
१ ते १५ जानेवारी दरम्यान पहिला टप्पा राबवल्यानंतर दिल्लीकरांकडून जो प्रतिसाद मिळाला त्याआधारावर दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
सम विषम योजनेला जानेवारी महिन्यात दिल्लीकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता.दिल्लीतील ८१ टक्के जनतेने सम-विषम फॉर्म्युल्याच्या बाजूने कौल दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
दुस-या टप्प्यात कोणत्या वाहनांना वगळायचे त्यासंबंधी अजून निर्णय झालेला नाही. दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीतील सरकारने सम-विषण फॉर्म्युल्याचा निर्णय घेतला होता.
तेल विदेशी . गाडी विदेशी . प्रदूषण देशी .माझा भारत देश महान .राजकारणी नेत्यांनी विदेशी भांडवलदार नेत्यान कडे ठेवला आहे गहाण.आम्ही भारतीय प्रदुषणा मुले झालो आहे हैराण.