रणजी करंडकाच्या पहिल्याच लढतीत हरियाणावर चार गडी राखून मात करत गतविजेत्या मुंबईने विक्रमवीर सचिन तेंडूलकरला विजयी निरोप दिला.
लाहिली (रोहतक)- रणजी करंडकाच्या पहिल्याच लढतीत हरियाणावर चार गडी राखून मात करत गतविजेत्या मुंबईने विक्रमवीर सचिन तेंडूलकरला विजयी निरोप दिला. वास्तविक पहाता सचिनमुळेच मुंबईला या मोसमाची सुरुवात विजयाने करता आली.
चौधरी बन्सी लाल स्टेडियमवर सुरु असलेला मुंबई विरुध्द हरयाणा रणजी सामन्यात विजयासाठी आवश्यक असलेल्या आणखी ३९ धावा मुंबईने बुधवारी सकाळी केल्या. मात्र या धावा जमवण्यासाठी त्यांना दीड तास लागला. सचिनने नाबाद ७९ धावा करताना विजयात मोलाचे योगदान दिले. रणजी क्रिकेटच्या कारकिर्दीत सचिनने २३व्या वेळा मुंबईला जिंकून दिले.
हरियाणाविरुद्ध मुंबई जिंकेल असे वाटत नव्हते. दुस-या डावातही त्यांनी अचूक मारा करताना मुंबईच्या नाकी नऊ आणले.
हरयाणाचे २४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या मंगळवारी दिवसअखेरीस सहाबाद २०१ धावा झाल्या. तेव्हा सचिन ५५ आणि धवल कुलकर्णी सहा धावांवर नाबाद खेळत होते. बुधवारी सकाळी सचिनने २४ आणि धवलने १० धावा करुन मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
[EPSB]
मुंबई-हरयाणा सामना रंगतदार स्थितीत
चौधरी बन्सी लाल स्टेडियमवर सुरु असलेला मुंबई विरुध्द हरयाणा रणजी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे.
[/EPSB]
Sachin I admire you because my sweetheart Rajeev Rale likes you